tag:blogger.com,1999:blog-25277628022616299272024-02-19T07:20:00.247-08:00Window SeatAshish Gosavihttp://www.blogger.com/profile/17619718332320901865noreply@blogger.comBlogger10125tag:blogger.com,1999:blog-2527762802261629927.post-24981383615977887192017-01-29T18:57:00.001-08:002017-02-02T06:23:18.923-08:00आवाजालाही व्यायाम हवा<div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on">
<div class="separator" style="clear: both; text-align: center;">
<a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhdHvrDKJbD1_igGKjvnAoBg6gC4lRiBSW3WVrHS8G5BPdbvzRJFTSUPq6AvtojltZzhjyX5UMP1GG9RxonMg3Zu34HWX9K5VCU3aXIAQFJnuqbJm8AI9rPBUcP0UkCi1gGAg2F5WCOUDM/s1600/04-2.jpg" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"><b><img border="0" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhdHvrDKJbD1_igGKjvnAoBg6gC4lRiBSW3WVrHS8G5BPdbvzRJFTSUPq6AvtojltZzhjyX5UMP1GG9RxonMg3Zu34HWX9K5VCU3aXIAQFJnuqbJm8AI9rPBUcP0UkCi1gGAg2F5WCOUDM/s1600/04-2.jpg" /></b></a></div>
<div style="background-color: white; border: 0px; color: #404040; font-family: "Ek Mukta", sans-serif; font-size: 17px; font-stretch: inherit; font-variant-numeric: inherit; line-height: 30px; outline: none; padding: 0px 0px 20px;">
<br /></div>
<div style="background-color: white; border: 0px; color: #404040; font-family: "Ek Mukta", sans-serif; font-size: 17px; font-stretch: inherit; font-variant-numeric: inherit; line-height: 30px; outline: none; padding: 0px 0px 20px;">
आवाज हे वक्तृत्वाचे मुख्य अंग आहे. माणसाच्या नुसत्या बोलण्याच्या आवाजावरून त्याच्या अंतर्बाह्य़ संस्कृतीचा बोध होतो. वक्त्याच्या तोंडून नुसता पहिला स्वर निघताच तो विद्वान, व्यासंगी, निश्चयी, सत्यप्रेमी, कळकळीचा आहे की हळवा, कमजोर आहे याची श्रोत्यांना पारख करता येते. मनुष्याच्या अंत:करणातील गूढ विकाराचे आविष्करण त्याच्या स्वरांच्या रोखठोक अथवा कंपित लहरींवरून होत असल्यामुळे शीलाने तो कच्चा की पक्का, त्याच्या स्वभावातील बरे-वाईट गुणधर्म कोणते, त्याच्या भाषणात नि:स्पृहता आहे की दंभ आहे, तो ज्या विषयावर बोलणार आहे त्याबद्दल त्याचा आत्मविश्वास भरपूर आहे की कोता वगैरे अनेक गोष्टींचा साक्षात्कार श्रोत्यांना होतो.</div>
<div style="background-color: white; border: 0px; color: #404040; font-family: "Ek Mukta", sans-serif; font-size: 17px; font-stretch: inherit; font-variant-numeric: inherit; line-height: 30px; outline: none; padding: 0px 0px 20px;">
भाषणाला काय किंवा व्याख्यान, प्रवचन, कीर्तनाला काय, निकोप आवाज हे मोठे आवश्यक भांडवल आहे. घोगरे, किरटे, चिरफाळलेले किंवा कोकीळकंठी बायकी आवाजाचे वक्ते पट्टीचे पंडित असले तरी श्रोत्यांवर त्यांना आपली छाप पाडता येत नाही. चारचौघांत बसून गप्पाष्टकी संभाषण करतानाही उत्तम, गहिरा, मोहक आवाजाचा चतुरस्र असामी बाकीच्या मंडळींवर तेव्हाच इतकी छाप पाडतो की थोडय़ाच वेळात तो एकटा वक्ता आणि बाकीचे सारे उत्सुक श्रोते असा बनाव बनतो.</div>
<div style="background-color: white; border: 0px; color: #404040; font-family: "Ek Mukta", sans-serif; font-size: 17px; font-stretch: inherit; font-variant-numeric: inherit; line-height: 30px; outline: none; padding: 0px 0px 20px;">
आवाजालाही व्यायाम हवाच. व्यायामाने आणि नियमित आहार-विहाराने शरीरप्रकृती व काव्यशास्त्र विनोदप्रचुर ग्रंथांच्या व्यासंगाने मानसिक प्रकृती उत्तम राखण्याची आपण काळजी घेतो. शरीर नि मनाइतकाच आपला आवाजही निकोप आणि निरोगी राखण्याची जरुरी आहे हे फार थोडय़ांच्या लक्षात येते. सकाळ, संध्याकाळ दोन-दोन तास तंबोऱ्यावर सुरावटीची मेहनत (रियाज) करणाऱ्यांचा आवाज आणि आरोग्य उत्तम राहते.</div>
<div style="background-color: white; border: 0px; color: #404040; font-family: "Ek Mukta", sans-serif; font-size: 17px; font-stretch: inherit; font-variant-numeric: inherit; line-height: 30px; outline: none; padding: 0px 0px 20px;">
उत्तम आकर्षक गायनासाठी सकस, निकोप आणि झारदार गळ्याची जेवढी आवश्यकता तेवढीच ती भाषिक वक्त्यांनाही असावी लागते. वक्त्यांच्या पांडित्यापेक्षाही त्याच्या भरघोस मोहक आवाजाच्या मोहिनीचाच श्रोत्यांवर परिणाम होत असतो. पं. विष्णू दिगंबर पलुस्कर हे जसे उच्च श्रेणीचे गायनाचार्य होते तसे पट्टीचे वक्तेही होते. त्यांचे शास्त्रोक्त गायन ऐकताना श्रोते नादब्रह्माने जसे मंत्रमुग्ध होत तसेच त्यांचे व्याख्यान, प्रवचन चालले असतानाही श्रोते तल्लीनतेने माना डोलवीत असत. महर्षी धोंडो केशव कर्वे. त्यांनी शंभरी ओलांडली. पण त्यांच्या आवाजातील गोंडसपणा आणि गोडवा जणू काय अगदी बाल आवाजाचाच वाटत असे. कशाचा हा परिणाम? शारीरिक आणि मानसिक आरोग्याप्रमाणे या थोर पुरुषांनी आवाजाच्या आरोग्यालाही तितक्याच काळजीने जोपासले.</div>
<div style="background-color: white; border: 0px; color: #404040; font-family: "Ek Mukta", sans-serif; font-size: 17px; font-stretch: inherit; font-variant-numeric: inherit; line-height: 30px; outline: none; padding: 0px 0px 20px;">
आवाज कमाविण्यासाठी वक्तृत्वाच्या हौशी व महत्त्वाकांक्षी उमेदवारांनी एखाद्या गवयाचे मार्गदर्शन पत्करल्यास फार चांगले. रोज तास-अर्धा तास तंबोऱ्यावर किंवा पेटीच्या स्वरावर खर्ज लावण्याच्या कसरतीने किरटा, घोगरा, कमताकद आवाज सुधारल्याची उदाहरणे आहेत.</div>
<div id="inarticle_wrapper_div" style="background-color: white; border: 0px; color: #404040; font-family: "Ek Mukta", sans-serif; font-size: 17px; font-stretch: inherit; font-variant-numeric: inherit; line-height: inherit; margin: 0px; outline: none; padding: 0px;">
</div>
<div style="background-color: white; border: 0px; color: #404040; font-family: "Ek Mukta", sans-serif; font-size: 17px; font-stretch: inherit; font-variant-numeric: inherit; line-height: 30px; outline: none; padding: 0px 0px 20px;">
आवाजाचा उपयोग करताना त्यावर कसल्याही प्रकारचा शारीरिक किंवा मानसिक दाब नसावा. तो अगदी मोकळा, दिलखुलास असावा. चोरटा नसावा. भाषणाची सुरुवात अगदी मंद, साहजिक आणि तोलदार आवाजात केली म्हणजे विचारशक्ती आपल्या ताब्यात राहते. उच्चार स्वच्छ, स्पष्ट आणि ठाशीव असले म्हणजे शब्दांचा नाद-निनाद श्रोत्यांच्या मनावर छान परिणाम घडवितो.</div>
<div style="background-color: white; border: 0px; color: #404040; font-family: "Ek Mukta", sans-serif; font-size: 17px; font-stretch: inherit; font-variant-numeric: inherit; line-height: 30px; outline: none; padding: 0px 0px 20px;">
माईकवर मोठय़ा आवाजात बोलणे ही आवाजाची वारेमाप उधळपट्टीच आहे. ती टाळावी. श्रोता आणि वक्ता परस्पर सन्मुख असले पाहिजेत. भाषणात खरे महत्त्व भावनेला असून स्वरांच्या खोचा, वाक आणि आरोह-अवरोह निरनिराळ्या गोष्टीतील, विचारांतील किंवा तत्त्वातील भेद दर्शवितात.</div>
</div>
Ashish Gosavihttp://www.blogger.com/profile/17619718332320901865noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-2527762802261629927.post-2222956795672542512017-01-29T18:48:00.003-08:002017-01-29T18:48:53.936-08:00‘स्व’त्व!<div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on">
<div class="separator" style="clear: both; text-align: center;">
<a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhiwf-tjsChFl_jzTqS7vZvYHpRpmuSibNWAWiLhpu69n0t6g5MjYWn-e8FiTVF8gHtOjSK47KajmEd8zWmFFQgga5Jk0AQbfL31P-3XsEo9YXPiFEirc0qy3pESXQsVxYiuI96nYV4Gso/s1600/02-3.jpg" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"><img border="0" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhiwf-tjsChFl_jzTqS7vZvYHpRpmuSibNWAWiLhpu69n0t6g5MjYWn-e8FiTVF8gHtOjSK47KajmEd8zWmFFQgga5Jk0AQbfL31P-3XsEo9YXPiFEirc0qy3pESXQsVxYiuI96nYV4Gso/s1600/02-3.jpg" /></a></div>
<div style="background-color: white; border: 0px; color: #404040; font-family: "Ek Mukta", sans-serif; font-size: 17px; font-stretch: inherit; font-variant-numeric: inherit; line-height: 30px; outline: none; padding: 0px 0px 20px;">
रवींद्रनाथांचे वडीलबंधू द्विजेंद्रनाथ हे उत्तम चित्रकारही होते. एकदा त्यांचा एक विद्यार्थी त्याने काढलेले चित्र घेऊन द्विजेंद्रनाथांना दाखवायला आला. वऱ्हांडय़ातच त्याची गाठ रवींद्रनाथांशी पडली. रवींद्रनाथांनी ते चित्र पाहिले आणि ते हरखून गेले. त्यातले आकार, त्यातली रंगसंगती, त्यातली त्रिमिती आणि मुख्य त्या चित्रातला चित्रकार म्हणून त्याचा विचार, सारे काही अद्भुत होते. रवींद्र त्या चित्राकडे पाहातच राहिले.</div>
<div style="background-color: white; border: 0px; color: #404040; font-family: "Ek Mukta", sans-serif; font-size: 17px; font-stretch: inherit; font-variant-numeric: inherit; line-height: 30px; outline: none; padding: 0px 0px 20px;">
तेवढय़ात द्विजेंद्रनाथही तिथे आले. रवींद्रांनी ते चित्र दादांना दाखवले. तोंड भरून त्या चित्राचे कौतुक केले आणि आता दादांची प्रतिक्रिया काय म्हणून दादांच्या चेहऱ्याकडे पाहिले. दादांच्या चेहऱ्यावर आनंद अजिबात नव्हता, त्यांची भुवई चढली होती, ओठ आवळले गेले होते. मस्तकावरची शीर फुगली होती.. रवींद्रनाथांना कळेना.. दादांना या चित्राचा आनंद का होत नाहीये? ते एवढे संतापले का? आपल्या विद्यार्थ्यांने इतके चांगले काढलेले चित्र पाहून दादांना त्रास व्हावा? विद्यार्थ्यांचे यश गुरुला खुपावे? असा एक चुकार विचारही रवींद्रांच्या मनात येऊन गेला. तेवढय़ात दादांनी ते चित्र रवींद्रांच्या हातातून खेचून घेतले नि फाडून टाकले. रवींद्रनाथ थोडय़ा आश्चर्याने, रागाने हे सगळे पाहत होते. त्या विद्यार्थ्यांच्या डोळ्यांतून अश्रुधारा वाहू लागल्या.. त्या विद्यार्थ्यांच्या मेहनतीचा दादाने असा चुराडा करावा? रवींद्रांना सहन झाले नाही, ते म्हणाले, ‘‘दादा..’’ द्विजेंद्रनाथांनी संतापलेल्या डोळ्यांनीच त्यांना गप्प बसण्याची खूण केली आणि त्या चित्राचे तुकडे तुकडे करून त्या विद्यार्थ्यांच्या अंगावर भिरकावले. विद्यार्थी भरल्या डोळ्यांनी मान खाली घालून निघून गेला. दादा आत गेले आणि त्यांनी काढलेले चित्र घेऊन बाहेर आले.. अगदी तसेच.. जसे त्या विद्यार्थ्यांने काढले होते. त्यातले आकार, रंगसंगती, त्रिमिती आणि चित्रकार म्हणून त्यातला विचार.. सगळे अगदी तेच! रवींद्रनाथांच्या डोळ्यांतले दादांच्या वागण्याबद्दलचे आश्चर्य मावळले.. ‘गुरुला शिष्याचे यश बघवले नाही का?’.. या विचाराबद्दल रवींद्रांना अपराधी वाटू लागले.. शिष्याचे यश गुरुला खुपले नव्हते, तर त्याचे यश निर्विवाद असावे, स्वत:चे असावे म्हणून गुरुने धारण केलेले ते रौद्ररूप होते!</div>
<div style="background-color: white; border: 0px; color: #404040; font-family: "Ek Mukta", sans-serif; font-size: 17px; font-stretch: inherit; font-variant-numeric: inherit; line-height: 30px; outline: none; padding: 0px 0px 20px;">
कलेतले यश हे अनुकरणाने टिकत नाही, तर कलावंताचा कलेतल्या ‘स्व’त्वानेच टिकते.</div>
<div style="background-color: white; border: 0px; color: #404040; font-family: "Ek Mukta", sans-serif; font-size: 17px; font-stretch: inherit; font-variant-numeric: inherit; line-height: 30px; outline: none; padding: 0px 0px 20px;">
गुरुमुख से सीख पावूँ सूर ताल बंधी</div>
<div style="background-color: white; border: 0px; color: #404040; font-family: "Ek Mukta", sans-serif; font-size: 17px; font-stretch: inherit; font-variant-numeric: inherit; line-height: 30px; outline: none; padding: 0px 0px 20px;">
वाहू को गाए बजाये नायकी कहलायी.</div>
<div style="background-color: white; border: 0px; color: #404040; font-family: "Ek Mukta", sans-serif; font-size: 17px; font-stretch: inherit; font-variant-numeric: inherit; line-height: 30px; outline: none; padding: 0px 0px 20px;">
अशी पं. रातंजनकरबुवांची एक बंदिश आहे. जसेच्या तसे अनुकरण करणे ही नायकी.. पण या नायकीचे गायकीत रूपांतर व्हायला हवे असेल तर त्यात स्वत:चा विचार, स्वत:चा अनुभव हवाच.</div>
<div style="background-color: white; border: 0px; color: #404040; font-family: "Ek Mukta", sans-serif; font-size: 17px; font-stretch: inherit; font-variant-numeric: inherit; line-height: 30px; outline: none; padding: 0px 0px 20px;">
उपजत अंग स्वभाव ले तान आलाप</div>
<div style="background-color: white; border: 0px; color: #404040; font-family: "Ek Mukta", sans-serif; font-size: 17px; font-stretch: inherit; font-variant-numeric: inherit; line-height: 30px; outline: none; padding: 0px 0px 20px;">
किये राग सिंगार गायकी कहलायी</div>
<div style="background-color: white; border: 0px; color: #404040; font-family: "Ek Mukta", sans-serif; font-size: 17px; font-stretch: inherit; font-variant-numeric: inherit; line-height: 30px; outline: none; padding: 0px 0px 20px;">
द्विजेंद्रनाथांनी काढलेले चित्र हे त्यांच्या अनेक वर्षांच्या अनुभवातून, विचारांतून, परिपक्वतेतून आलेले. विद्यार्थ्यांकडे उत्तम चित्र काढण्याची क्षमता जरी अफाट असली तरी ते केवळ अनुकरण होते. अनुकरण हे साचल्या डबक्याप्रमाणे, तर अनुभव हा वाहत्या प्रवाहासारखा. अनुकरणाने कला साध्य होईल, पण सिद्ध होणार नाही. कला म्हणजे अवस्थांतर. शिकण्याच्या अवस्थेपासून स्वत:ला व्यक्त करण्याच्या अवस्थेपर्यंतचा प्रवास म्हणजे कला. मागे एकदा एका रिअॅलिटी शोमध्ये १८ वर्षांचा मुलगा खूप सुंदर गायला. सगळ्या परीक्षकांनी तोंड भरून कौतुक केले. एक बुजुर्ग गायक त्या दिवशी अतिथी परीक्षक म्हणून आले होते. त्यांना जेव्हा त्यांची प्रतिक्रिया विचारली तेव्हा ते म्हणाले, ‘‘अगदी मूळ गायकासारखे याने गायले. हे कॉपी-पेस्ट उत्तम होते.. पण माझी खरी प्रतिक्रिया मी अजून २० वर्षांनंतर देईन तेव्हा जर हा स्वत:चे काही गात असेल तर!’’ बुजुर्गाची ही प्रतिक्रिया सध्याच्या वा! वा!च्या जगात जरा बोचरीच होती; पण समजून घेतली तर डोळे उघडणारी होती..</div>
<div id="inarticle_wrapper_div" style="background-color: white; border: 0px; color: #404040; font-family: "Ek Mukta", sans-serif; font-size: 17px; font-stretch: inherit; font-variant-numeric: inherit; line-height: inherit; margin: 0px; outline: none; padding: 0px;">
</div>
<div style="background-color: white; border: 0px; color: #404040; font-family: "Ek Mukta", sans-serif; font-size: 17px; font-stretch: inherit; font-variant-numeric: inherit; line-height: 30px; outline: none; padding: 0px 0px 20px;">
‘स्वत:चे काही गात असेल तर’ यातला स्वत:चे हा शब्द फार महत्त्वाचा. आपला स्वत:चा विचार असायला हवा, भले तो छोटा असला तरी चालेल, फार व्यापक नसला तरी चालेल; पण तो आपला हवा. ज्ञानेश्वर माउलींनी गीतेचा भावार्थ सांगितला. म्हणजे विचार गीतेतले, पण ते अधिक उलगडून सांगितले; पण गीतेच्या विचारांची चौकट त्यांनी कायम पाळली. गीतेच्या शेवटी पसायदान लिहिताना मात्र त्यांनी स्वत:चा विचार मांडला, कारण पसायदान ही त्यांची स्वत:ची निर्मिती होती. इथे ते गीतेच्या विचारांच्या चौकटीत थांबले नाहीत, तर गीतेच्या विचारांच्या पुढे त्यांनी एक पाऊल टाकले. भगवंताने सांगितले, ‘परित्राणाय साधुनां विनाशायच दुष्कृताम्’ – ‘दुर्जनांच्या विनाशासाठी मी येईन’ ..पण माउली मात्र पसायदानात यापेक्षा उंच असा स्वत:चा विचार मांडतात. ‘जे खळांची व्यंकटी सांडो’ ..खल असला तरी माणूस आहे. आत्ता वेगळ्या वाटेला गेलाय.. कदाचित परिस्थितीमुळे तसा झाला असेल; पण आतले स्वत्व चांगले असणार आहे. म्हणून खलांचा विनाश नको, तर खलांचे खलत्व दूर व्हावे, त्यांची वाकडी बुद्धी नाहीशी होवो, असे मागणे ते मागतात. ७०० श्लोकांचे ९००० ओव्यांत रूपांतर केल्यावर माउली स्वत:चा विचार शेवटी मांडतात, मांडू शकतात हे खरे ‘स्व’त्व!</div>
<div style="background-color: white; border: 0px; color: #404040; font-family: "Ek Mukta", sans-serif; font-size: 17px; font-stretch: inherit; font-variant-numeric: inherit; line-height: 30px; outline: none; padding: 0px 0px 20px;">
अनेक शब्दांचे अर्थ हळूहळू घरंगळायला लागलेत. व्यवहारी, चतुर यांना सध्या धूर्तपणाची छटा आली आहे, तर उदासीन निराशेकडे झुकलाय तसेच ‘स्व’त्व म्हणजे अहंकार, दुरभिमान असा अर्थ वाटू लागलाय; पण ‘स्व’त्व म्हणजे अहंकार नाही, तर परिस्थिती, जडणघडण, अनुभव यातून घडलेले, वेगळेपण असणारे आपले व्यक्तित्व म्हणजे ‘स्व’त्व, आपल्या अस्तित्वाची जाणीव, स्वत:ला ओळखण्याची क्षमता. स्वत:ला ओळखता आले तर ‘स्व’त्व जपता येते. म्हणजे पुन्हा ‘कोऽहं’ हा सनातन प्रश्न आलाच. हा प्रश्न फक्त अध्यात्मात नाही तर कलेत आणि रोजच्या जगण्यातही पडतो.. किंबहुना पडायला हवा. अध्यात्मात कोऽहं आतल्या चैतन्याशी निगडित असतो, तर जगण्यात आणि कलेत तो स्वत:ला अधिक जाणून घेण्यासाठी असतो. म्हणजे आपल्या आवडीनिवडी, गुणदोष, क्षमता, विचार. कोऽहं चे उत्तर अध्यात्मात झटकन सोऽहं असे देता येते. (ते कळले किंवा कळले नाही तरी) पण जगण्यात आणि कलेत अगदी शेवटच्या श्वासापर्यंत कधी कधी याचे उत्तर देता येत नाही. अध्यात्मात, परमार्थात बरे असते. ‘स्व’चे समर्पणच करून टाकायचे असते.. ‘जो मेरा है वो तेरा है’ असे म्हणून मोकळे होता येते.. पण कलेत, जगण्यात असे मोकळे होता येत नाही. जे माझे आहे ते माझेच आहे.. भलेबुरे, चांगले-वाईट, लहानमोठे, यशापयशाचे धनी आपणच! यशाचे माप दुसऱ्याच्या पदरात टाकता तरी येते; पण अपयश मात्र आपलेच. कलेत किंवा जगण्यात ‘स्व’त्व विसर्जित करता येत नाही, तर ते सतत जागे ठेवावे लागते..</div>
<div style="background-color: white; border: 0px; color: #404040; font-family: "Ek Mukta", sans-serif; font-size: 17px; font-stretch: inherit; font-variant-numeric: inherit; line-height: 30px; outline: none; padding: 0px 0px 20px;">
‘स्व’त्व जागे कसे असते यासाठी सुप्रसिद्ध व्हायोलिनवादक मिश्चेरचे वाक्य सांगता येईल. मिश्चेर म्हणतात, ‘‘जर मी ३ दिवस सलग रियाज केला नाही तर माझ्या श्रोत्यांना ते माझ्या वादनातून कळते, मी सलग २ दिवस रियाज केला नाही तर ते माझ्या समीक्षकांना कळते आणि मी १ दिवस जरी रियाज केला नाही तर कार्यक्रमात ते मला कळते..’’ ‘स्व’त्व जागे असलेली व्यक्तीच स्वत:शी अशी प्रामाणिक राहू शकते. आपले गाणे आपण म्हटले पाहिजे; पण ते आधी आपल्याला पटले पाहिजे. मग आपले ‘स्व’त्व त्यात उतरल्याशिवाय राहणार नाही. कुसुमाग्रज म्हणाले होते, ‘‘तुम्ही माझ्या कवितेशी बोलत असाल तर माझ्याशी बोलूच नका, कारण माझ्या कवितेतच मी सापडेन तुम्हाला पुष्कळसा..’’ ‘स्व’त्व जागे असेल तर कला आणि जगणे असे एकरूप होऊन जाते. प्रत्येकाच्या अंतरंगातले चैतन्य जरी एकच असले (ममैवांशो जीवलोक:) तरी प्रत्येकाचा ‘स्व’ मात्र वेगळा असतो.</div>
<div style="background-color: white; border: 0px; color: #404040; font-family: "Ek Mukta", sans-serif; font-size: 17px; font-stretch: inherit; font-variant-numeric: inherit; line-height: 30px; outline: none; padding: 0px 0px 20px;">
‘असो पाखरू मासोळी जीव जीवार मुंगळी</div>
<div style="background-color: white; border: 0px; color: #404040; font-family: "Ek Mukta", sans-serif; font-size: 17px; font-stretch: inherit; font-variant-numeric: inherit; line-height: 30px; outline: none; padding: 0px 0px 20px;">
प्रत्येकाची ठेव ठेव काही आगळी वेगळी..’</div>
<div style="background-color: white; border: 0px; color: #404040; font-family: "Ek Mukta", sans-serif; font-size: 17px; font-stretch: inherit; font-variant-numeric: inherit; line-height: 30px; outline: none; padding: 0px 0px 20px;">
हे आगळेवेगळे ‘स्व’त्व आपल्या ठायी आहे याची जाणीव ज्या क्षणी होते तेव्हाच आतली कला, आपण, आपले विचार बहरायला लागतात. हा कलेचा बहर आपल्या विद्यार्थ्यांच्याही आयुष्यात यावा, हीच द्विजेंद्रनाथांची इच्छा होती. चित्र फाडून टाकण्याच्या एका क्षणाच्या कृतीत ‘स्व’त्वाचे सारे विचारसंचित सामावले होते! या कथेत द्विजेन्द्रनाथांच्या विद्यार्थ्यांने पुढे काय केले हे माहीत नाही; पण नक्कीच त्या चित्रात न उमटलेले ‘स्व’त्व त्याला गवसले असेल. ते चित्र आता त्याच्या दृष्टीतून, विचारातून जन्माला आले असेल.</div>
<br /></div>
Ashish Gosavihttp://www.blogger.com/profile/17619718332320901865noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-2527762802261629927.post-74819158720085817472016-05-04T17:29:00.001-07:002016-05-04T17:29:52.139-07:00खडे बोल..<p style="margin: 0px; font-size: 12px; font-family: Helvetica; min-height: 15px;"><br></p>
<p style="margin: 0px; font-size: 12px; font-family: Helvetica; min-height: 15px;"><br></p>
<p style="margin: 0px; font-size: 12px; font-family: Helvetica;">नागराज मंजुळे हा अविश्वसनीय क्षमतेचा चित्रपट दिग्दर्शक आहे. ही प्रतिमासृष्टी, प्रतिकात्मकता, शब्दकळा सिनेमानं यापूर्वी कधी पाहिली नव्हती. जागतिकीकरणानंतरच्या व्यवस्थेत ‘राइज ऑफ द रेस्ट’चे पर्व यावे आणि त्याचवेळी खुलेपणाचा अवकाश व्यापून नव्या मक्तेदारीसाठी जुन्याच सरंजामदारांनी सज्ज व्हावे, हे एकाच वेळी घडत असताना नागराजचा सिनेमा आला. </p>
<p style="margin: 0px; font-size: 12px; font-family: Helvetica;">नागराजचा सिनेमा ही त्याची गोष्ट आहे, असे अनेकांना वाटते. कदाचित त्यालाही तसे वाटत असेल. पण, ती गोष्ट त्याची एकट्याची नाही. ती या काळाची गोष्ट आहे. नागराजसारख्या दगडावर घाव घालण्यात आयुष्य गेलेल्या तरुणाचे अशा गोष्टीचे आपले असे एक आकलन असते. अवतीभवती कमालीचा अंधार असताना पहाटेचे स्वप्न पडावे, हा नव्या काळाचा चमत्कार खराच, पण त्या स्वप्नाच्या दिशेने चालताना मात्र कोलमडण्याची वेळ येते. होत्याचे नव्हते होते. तीव्र संताप येतो. हे सगळे बदलायला हवे, असे आतून वाटत जाते. जो ‘जादुई वास्तववाद’ नागराजच्या ‘फॅंड्री’त वेगळ्या पद्धतीने दिसतो, त्यापेक्षा प्रत्यक्ष वास्तव फार भयाण रुपात समोर येते. या वास्तवाला न जुमानता स्वप्ने पाहण्याची ताकद नागराजचा सिनेमा देतो. पण, स्वप्नांपेक्षा वास्तव अधिक प्रभावी, राक्षसी ठरते. अशावेळी स्वप्नांचा चोळामोळा होत असताना, वास्तव बदलण्याची अपरिहार्यता नागराजचा सिनेमा अधोरेखित करतो. एखाद्या कवितेप्रमाणे, ललित गद्याप्रमाणे पुढे सरकणारा त्याचा सिनेमा शेवटी आपल्याला खोल, खोल घेऊन जातो. </p>
<p style="margin: 0px; font-size: 12px; font-family: Helvetica;">साधारणपणे, सुरुवातीला संघर्ष आणि मग मध्यंतरानंतर सुखांत, अशा वातावरणातील सिनेमाने आपल्याला वाढवले आहे. हा सिनेमा मात्र आधी स्वप्नं दाखवतो, स्वप्नासाठी झगडतो आणि मग वास्तवाच्या समोर ते स्वप्न हतबल ठरतानाही आपण पाहातो. ‘फॅंड्री’तल्या जब्याचा दगड असो की ‘सैराट’च्या आर्चीची गोळी! एका अर्थाने, नागराज भयावह वास्तवाच्या पटावर स्वप्नचित्र रेखू लागतो. अशावेळी, हा सिनेमा जगणं सुंदर करण्याची आस बाळगून असतो. वास्तव कितीही भयावह असलं तरी त्यापासून पळ काढायचा, असं नायकाला-नायिकेला वाटत नाही. ही या सिनेमाची सकारात्मकता आहे. आणि, वास्तव तुमच्या स्वप्नांचा खून करतं, हे या सिनेमांचं वास्तवाविषयीचं आकलन आहे. </p>
<p style="margin: 0px; font-size: 12px; font-family: Helvetica;">हे आकलन त्या मातीत जन्माला आलं आहे, जिथं हे वास्तव वस्तीला आहे. नॉर्मली घडतं असं की वास्तवाच्या मुक्कामाचं ठिकाण आणि आकलन जिथून उगवतं ती साक्षात्कारी जागा यांच्यात काही जैव नातं नसतं. या सिनेमाची सगळी मूल्यव्यवस्था आणि प्रतिकात्मकता त्या मातीतील आहे. विहिरीत बुडी मारुन वर येणा-या नायकाची नायिकेशी होणारी नजरानजर हे प्रेमप्रकरण आपल्या भावविश्वात अमिट असले तरी बाहेरच्या रुपेरी विश्वात याला आजवर कधीच जागा नव्हती. “तुला नसंल आवडंत, तर नकोस की बघू” यावर “मी कुटं म्हनलं, मला नाय आवडत?” अशा संवादांवर पुन्हा मित्रांचा रंगणारा परिसंवाद, हे अनेकांचं जगणं होतं, पण ते पडद्याला कधी उमगलं नव्हतं. </p>
<p style="margin: 0px; font-size: 12px; font-family: Helvetica;">सिनेमा ‘खरा’ असला पाहिजे, या नादात जगभरातल्या अनेक दिग्दर्शकांनी तो प्रेक्षकांपासूनच हिरावून घेतला. कंटाळवाणा, बोर, संथ आणि अधिक तंत्रज्ञानी केला. (त्यातून खोट्या सिनेमाचा बोभाटा जास्तीच वाढला!) कारण, हे खरेपण पुस्तकी होते. सिनेमा खरा व्हायचा असेल, तर तो ख-याखु-या माणसांचा, खरी भाषा बोलणारा, खराखुरा सिनेमा असायला हवा, हे नागराजच्या सिनेमाचे वेगळेपण आहे. तो खरा आहे आणि तरीही ‘सिनेमा’ही आहे! </p>
<p style="margin: 0px; font-size: 12px; font-family: Helvetica;">जागतिकीकरणाच्या पूर्वी असा सिनेमा येऊच शकला नसता. जागतिकीकरण आल्या-आल्या, म्हणजे, एकविसाव्या शतकाच्या पहिल्या दशकात वगैरे हा सिनेमा येऊ शकला असता, पण तो फ्लॉप ठरला असता. जागतिकीकरणाचे दुसरे पर्व सुरु असताना, हा सिनेमा येणे आणि तो चालणे, यात एक सूत्र आहे. पहिल्या टप्प्यात फक्त खुलेपणा आणि त्यामुळे खुणावणारे संधींचे आकाश होते. तीव्र झालेले ताणही जागतिकीकरणाच्या दुस-या टप्प्याने अधोरेखित केले आहेत. ‘राइज ऑफ द रेस्ट’ हे ऐकायला फार छान वाटते. पण, त्यामुळे वाढणारे ताण काय असतात, हे आपण बघत आहोत. जातीय संघर्ष ज्या तीव्रतेने दिसत आहेत, विखार आणि असहिष्णुतेचे वातावरण ज्या पद्धतीने समोर येत आहे, अशा वेळी असा सिनेमा येणे आणि उलटसुलट अशा, दोन्ही बाजूंच्या टोकदार चर्चेसह, तो प्रचंड यशस्वी होणे हे अगदी स्वाभाविक आहे. </p>
<p style="margin: 0px; font-size: 12px; font-family: Helvetica;">अशावेळी काही मराठा “नेत्यां”ना मिरच्या झोंबल्यात! जातीच्या नावाने संघटना स्थापन करुन जातीअंताची भाषा करणारे मराठा नेते दांभिक तर असतातच, पण नतदृष्ट त्याहून अधिक. फुले, आंबेडकरांचे, शाहूंचे नाव एखाद्या चलनी नाण्यासारखे वापरायचे आणि ब्राह्मणद्वेषाच्या जोडीला दलितविरोधही जपत आपले मराठेपण मिरवायचे, हे माहीत असलेल्या अशा मराठा नेत्यांना ‘सैराट’ कधी समजणार नाही. कारण, त्यांना शिवरायही समजलेले नाहीत. शिवरायांची समाधी ज्योतिबांनी शोधून शिवाजीचा पवाडा जगाला सांगितला नसता, तर यांच्यापैकी कोणालाही हा आपला प्रेरणास्रोत आहे, हे समजलेही नसते. तो बाबासाहेब आंबेडकर नावाचा महामानव चवदार तळ्याचा सत्याग्रह करताना सांगत होता, की मी हा सत्याग्रह इथे करतोय, कारण माझे त्या शिवबाशी, रयतेच्या राजाशी जैव नाते आहे. हे नाते ज्या मराठ्यांना समजत नाही, ते तेव्हाही शिवरायांसोबत नव्हते. </p>
<p style="margin: 0px; font-size: 12px; font-family: Helvetica;">ब्राह्मणद्वेषाचे राजकारण फक्त पुढे रेटण्यासाठी यांना बहुजनवाद हवा असतो. पण, ज्या न्यायाने ब्राह्मणवादाला विरोध करायला हवा, त्याच न्यायाने मराठावादालाही विरोध करायला हवा. कारण, दलित आणि महिलांच्या शोषणाची ॲकॅडॅमिक चौकट जरी ब्राह्मणांनी तयार केली असली, तरी प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी केली ती मराठ्यांनीच. त्यामुळे या पापापासून त्यांना दूर पळता येणार नाही. दुसरे असे की, ज्या गतीने ब्राह्मण बदलले आणि तुलनेने सर्वसमावेशक होत गेले, एवढेच नाहीतर, परिवर्तनाच्या लढ्याचे शिलेदारही झाले, ते मराठ्यांच्या बाबतीत त्या प्रमाणात घडले नाही. आंतरजातीय- त्यातही मराठा-दलित असे किती विवाह झालेत, याची आकडेवारी ते स्पष्टपणे सांगेल. ‘आंतरजातीय प्रेमविवाह’ हा जातीअंताच्या संदर्भातील सगळ्यात मोठा पुरावा असतो. (दलित मुलांसोबत लग्न करुन अनेकदा रोजची होरपळ सहन करणा-या ब्राह्मण मुलींना ‘विषकन्या’ म्हणणा-या बामसेफी विखारवंतांना ही मूलभूत गोष्टच समजत नाही!) नात्यागोत्यांचे राजकारण करणारे किती मराठा पुढारी याबाबतीत पुढाकार घेताना दिसतात? ‘बघतोस काय, मुजरा कर’, अशा मस्तीत ज्यांची हयात गेली, त्या मराठा संघटनांना अलिकडे पुरोगामी वगैरे म्हणण्याची प्रथा पडून गेली आहे. ‘सैराट’मुळे मराठ्यांची बदनामी झाली आहे, असे म्हणणा-या मराठ्यांनी आता एक करावे. त्यांनी शिवरायांचे, शाहूंचे नाव घेणे बंद करावे. कारण, त्यांना तो नैतिक अधिकार नाही. ‘सैराट’ हा वाईट, सामान्य, सुमार सिनेमा आहे, असे कोणाचे मत असेल, तर त्या मताविषयी मला आदर असेल. असे मत कोणत्याही सिनेमाविषयी, कलाकृतीविषयी असू शकते. पण, या चर्चेला काही स्तर असावा!</p>
<p style="margin: 0px; font-size: 12px; font-family: Helvetica;">नागराज हा प्रतिभावंत आणि प्रचंड ताकदीचा दिग्दर्शक आहे. हे माध्यम त्याला वश आहे. ‘सैराट’च्या प्रत्येक फ्रेममध्ये त्याने उत्कट प्रेम रेखाटले आहे. निसर्गाच्या सानिध्यातील एखाद्या खेड्यात माणसं किती निसर्गदत्त जगत असतात, किती आनंदानं नांदत असतात, असा आपला समज असतो. ‘टुरिझम ॲप्रोच’नं खेडं टिपणा-या लेखक-दिग्दर्शकांनी तो समज दृढ केलेला असतो. प्रत्यक्षात गावातलं जगणं अधिक हिंस्त्र, अधिक अमानुष आणि अधिक अनैसर्गिक असतं. (‘गाव सोडा’, असं बाबासाहेब उगाच नव्हते म्हणाले.) अर्थात, गाव हे एकक (युनिट) असतं, म्हणून ते ठळकपणे एकाच फ्रेममध्ये जाणवतं, एवढंच. निसर्गदत्त, रम्य-भव्यतेच्या पार्श्वभूमीवर नागराज गावाचं हे पाशवी रुप सावकाशपणे उलगडत शेवटी जो कडेलोट करतो, त्यानं अस्वस्थ होण्याऐवजी कोणाच्या जातीय अस्मिता कशा दुखावतात? (‘सैराट’ बघून त्या एका क्षणी तरी जात गळून पडावी!) गावातलं आयुष्य आनंदाचं आहे, असं त्यांना वाटणारच, जे या व्यवस्थेचे लाभार्थी आहेत. बाकी सा-या घटकांनीही, मग ते मुस्लिम असोत वा दलित, आणि अवघ्या महिला, आपापली स्पेस आखून घेत हे जगणे सुसह्य केलेले असते. या देशातल्या बायकांची किती घुसमट होते, हे पुरुषांना जाणवूही नये, अशा प्रकारे बायकांनी स्वतःला विरघळून टाकलेले असते. अशावेळी, एखादा ओरखडा उठतो, तेव्हा आतून तुम्ही काय आहात, हे समोर येते. ही हिंस्त्रता त्या मातीत आहेच. त्याचे पुरावे परशा-आर्चीच्या स्वप्ननगरीतही मिळत असतात. आपण मात्र तेव्हा ती ‘नॉर्मल’ मानून पुढे जातो. पण, त्याचा शेवट हाच असू शकतो. माझी एक देशमुख मैत्रीण म्हणाली, ते खरंय. “बाहेर सोडा, घरातील बायकांना माणूसपणाचे जगणे जे जगू देऊ शकत नाहीत, असे मराठे सावित्रीबाईंचा आणि जिजाऊंचा वारसा सांगतात, तेव्हा हसावे की रडावे, तेच समजत नाही.” हे सर्व मराठ्यांबद्दल खरे नाही. पण, मराठेपण मिरवणा-या मराठ्यांबद्दल खरे आहे. त्या न्यायाने जात मिरवणा-या कोणालाही ते लागू पडावे.</p>
<p style="margin: 0px; font-size: 12px; font-family: Helvetica;">बहुसंख्य आहोत आणि बलशाली आहोत, या जोरावर आपण हवे ते करु शकतो, अशी धारणा असणा-या याच मराठा नेत्यांना आकस्मिकपणे आपण मागासलेले आहोत, असा साक्षात्कारही अधूनमधून होत असतो. हे मागासलेपण आहेच, पण ते या धारणांच्या संदर्भातले आहे. त्याचा विचार केल्याशिवाय मराठ्यांना पुढे जाता येणार नाही. </p>
<p style="margin: 0px; font-size: 12px; font-family: Helvetica;">‘सैराट’च्या निमित्ताने लहान मुलांवरील संस्कारांचा जो मुद्दा पुढे आला आहे, तो आत्यंतिक बाळबोध आहे. कॉलेजमधील मुला-मुलींची प्रेमकहाणी, यात कुठले संस्कार आडवे येतात, हे काही मला समजलेले नाही. सिनेमा संस्कार करणारच असेल, तर ‘सैराट’ मुला-मुलींना भव्य, उत्कट प्रेम करायला शिकवेल. जातीपातीच्या पल्याडचं प्रेम शिकवेल. मुलींना बुलेट, ट्रॅक्टर (आणि, पिस्तुलही!) चालवायला शिकवेल. मुलींना 'चीज' नव्हे, तर सशक्त माणूस करेल आणि मुलांना समंजस करेल. मुला-मुलींची चिंता तुम्ही करु नका. काय शिकायचं आणि काय नाही, ते त्यांना चांगलं समजतं. नागराजप्रमाणं हे माध्यम या पिढीलाच वश आहे.</p>
<p style="margin: 0px; font-size: 12px; font-family: Helvetica;">(म्हणून तर, तुमच्यासारखे आई-बाप असूनही ही पिढी एवढी कर्तबगार निघालीय! संस्कारक्षम सौम्य विनोद हं!!!) </p>
<p style="margin: 0px; font-size: 12px; font-family: Helvetica;">मुद्दा आहे, तुमच्यावरील संस्कारांचा. पारंपरिक संस्कार पुसून, नव्या नितळ नजरेनं तुम्ही ‘सैराट’ बघणार की नाही? तुम्ही नाहीच बदललात, तर तुमच्याच घरातल्या परशा आणि आर्चीच्या रक्ताने हात माखतील तुमचे. प्रेमवीर नायक-नायिका हे फक्त उदाहरण. जात्यंध, धर्मांध मूलतत्त्ववाद अखेरीस सारंच संपवून टाकतो. मग, तुमचा रस्ता कोणता? प्रेमाचा की हिंसेचा? त्यावर तुमच्या पोरांचं आयुष्य अवलंबून आहे. बाकी कथित संस्कारांवर नाही.</p>
<p style="margin: 0px; font-size: 12px; font-family: Helvetica;">हे असं आहे आणि तरीही मला वाटतं, हे बदलेल. म्हणून तर जब्याच्या एक पाऊल पुढं परशा गेला! या बदलानंच नव्या ‘आकाशा’ला जन्म दिलाय. आता आणखी पुढं जाता येणं शक्य आहे. पण, त्यासाठी थोडं बदलायला हवं. मुलांची चिंता करु नका. त्यांची दिशा तीच आहे. तुमचं काय?</p>
<p style="margin: 0px; font-size: 12px; font-family: Helvetica; min-height: 15px;"><br></p>Ashish Gosavihttp://www.blogger.com/profile/17619718332320901865noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-2527762802261629927.post-66114042622653411492014-05-17T12:53:00.000-07:002014-05-17T13:21:35.565-07:00वृंदावन… <div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on">
<br /><br />कधिचं बंद पडलेलं कारंजं होतं तिच्या दारापुढे, तसं दारही सतत बंद असायचं<br /><br />खिडकिचंएक दार उघडं तर एक बंद असायचं जाळी जरा फाटलेली म्हणून घरातलं थोडं दिसायचं ,<br /><br />दिसण्यासाठी घरात होतं काय म्हणा.. ती बसायची ती मोडकी खुर्ची आणि कलंडत्या टेबलावर कधीचा राहून गेलेला पेला त्यातलं पाणी सुद्धा आता वाळून गेलं ती गेली तेंव्हा तिचा घसाही कोरडा होता.. पाणी समोर होतं पण म्हणे प्यायचं तिच्या लक्षातच आलं नाही.. दिवसभर तसा अंधारच असतो घरात.. रात्री जास्त गडद होतो इतकच.. कसली चाहूल नाही हालचाल नाही, आधी ती होती तेंव्हा किंवा ती असे पर्यंत एक मांजर तिच्या पाशी अंगाचं मुटकुळं करून बसायची पण ती ही स्तब्ध शांत.... ती तग धरू शकली नाही तर तो मुका जीव कुठला तग धरायला...आता माजलेल्या पाली सर्र्कन सरकतात मनत चर्र होतं,पण पालींचं सरपटणं ते कसलं? कीडा मुंगी बघून सरपटणार त्या... त्याने कधी हालचाल होते का?.....कुबट वास भरून राहिलाय त्या वास्तूत.. दाराशी गेलं की जाणवतो .म्हणे तिच्या राहून गेलेल्या समानाचा असेल.. तिच्या गावाला गेलो की मी डोकावतो कधी कधी तिच्या घरात,.. आणि तिच्या गावाला काय ,तिच्या घरात डोकावण्यासाठीच मी जातो.... आता कसली ओढ आहे कोणजाणे... तेंव्हा जमलं नाही... आणि आता..<br />तसे इथले गावकरी सांगतात वेळी अवेळी येऊ नका ती अजूनही कोणाकोणाला दिसते अंगावर चवताळून येते... जिवंतपणी जे जमलं नाही ते तिला गेल्यावर कसं जमेल?<br />पण मी कोणाशी फार बोलत नाही, नाहीतर माझ्याच तोंडून निघायचं तिने ही वास्तू माझ्याच नावावर केल्याचं.. नसते प्रष्न उभे राहयचे ते विचारायला आणखी चारजण यायचे<br />चारजणाना कळलं तरी हरकत नाही..<br />पण माझ्या मुलाना कळायला नको... हयातभर तिच्या वरून मला टोमणॆ मारले, मला भेटू दिलं नाही. पण वास्तूवर मालकी हक्क दाखवायला ते माझ्यावरही हक्क दाखवतील. वारशाहक्काने मालमत्ता मिळवायला ते माझाही विचार करू शकतील तसा मरणाला मी भीत नाही... ओसाड काय फक्त वास्तूच होत नाही..<br />भयाण काय फक्त घरच होत नाहीत विराण काय फक्त घरासमोरच्या हौसेनं लावलेल्या बागाच होत नाहीत...<br />वास्तू असो की व्यक्ती ती आप आपलं प्राक्तन घेऊन येते<br />ती तिचं प्राक्तन भोगून गेली , मी माझं भोगतोय..<br />पण तरी मुलांच्या हातून मरण यावं असं मला वाटतं नाही... त्यापेक्षा खरच तिनेच यावं आणि तिच्या बरोबर जाण्याचा मार्ग दाखवावा....<br />तिचं भूत बीत होणं शक्यच नाही... ज्यांच्या इछ्चा अपूर्ण राहतात त्यांची भूतं होतात.. तिने एकच ईछ्चा धरली होती आणि नंतर डोळे कोरडे ठेऊन त्यावरही पाणी सोडलं होतं... वाचून संपलेलं पुस्तक छातीशी धरून बसावं तशी ती जगून झालेलं आयुष्य कवटाळून बसली होती...तीचा शेवट झाला, ती सूटली आणि मी त्या बंद दारापाशी अडकलो.. नक्की कुठल्या मार्गानं ती सटकली...?<br />जरा हालचाल झाली जरासा आवाज झाला वास्तू जरा बावचळली मला क्षणभर वाटलं तीच आली.. म्हणाली ये मी कुठून सटकले ती फट तुला दाखवते... खरं सांगतो अजिबात घाबरलो नाही उलट उत्सुकतेने सावरलो.. आली आहेस तर दिसत का नाहीस असं व्याकूळतेने म्हणालो....<br />आणि तिन्हिसांजेच्या त्या धुळकट अंधारात दिसली ती मनी... तिची लाडकी मनीमाऊ.. ही इतकी वर्ष कशी जगली? हिने मला कसं ऒळखलंन?<br />पण खरच ती मला घाबरली नाही मी ही घाबरलो नाही जणू तिने मला खूण केली आणि मी तिच्या मागे मागे वास्तूच्या परसदारी गेलो... वड पिंपळ तसेच होते विहिर जाळी टाकून बंद केली होती विहिरी जवळची केळ कधीच सूकून जळायला आतूर झाल्यासारखी जख्ख वाळली होती.. लाजाळूचं रान पसरलं होतं..<br />जास्त निरखायला वेळ नव्हता कारण माऊला वेळ नव्हता तिची घाई ओळखून मी माऊच्या मागे गेलो मागच्या जिन्याखाली एक अडगळीची खोली होती त्याचं दार धक्का देऊन उघडता येत होतं माऊ आत गेली तशी भारावल्या सारखा मी सुद्धा तिच्या मागनं आत गेलो...तिच्या इतकं सहज आत जाणं मला जमलं नाही...पण गेलो आणि बघतो तर काय या माऊने चार पिल्लाना जन्म दिला होता... ती माऊ तिची नव्हती पण तिच्या माऊच्या वंशातली होती... कारण दहा पंधरा मांजरं आपाअपली जागा घेऊन निवांत बसली होती... जणू मी तिथे येतो मी येणार हे त्याना माहीतच होतं.. जशी तिची मनी मी गेलो की माझ्या मांडीवर येऊन बसायची तशीच ती मांजरं माझ्या भोवती जमा झाली..त्यांच्या नजरा माझ्याशी संवाद साधायला तत्पर होत्या...लयबद्ध शेपटी हालवत होत्या पण त्यामुळे तिथली शांतता भंग पावत नव्हती...<br />क्षणात मला त्या वास्तूत चैतन्य जाणवलं...घडामोड हा सृष्टीचा नियम आहे ती या ना त्या रूपात सूरूच असते कधी तिचा प्रवाहं खळखळता असतो.. कधी लूप्त....तिथे<br />भयाण आधी कधी वाटलच नाही पण आता साचून राहिलेलं मौनही पसार झालं<br />मी घरभर फिरलो मागच्या खोलीत, रावजींच्या म्हणजे तिच्या वडिलांच्या खोलीत... खरमरीत नकार ऐकायला एकदा त्या खोलीत डोकावलो होतो....ती जिन्याशी नजर जमिनीला खिळवून उभी होती, बाहेर पडताना तिरमिरीत मी तिच्याकडे बघितलही नव्हतं... तो जिना आज मी चढून वर गेलो मागल्या गच्चीचं दार सताड उघडलं....अधाशा सारखा घर भर फिरलो आणि तिला म्हणालो भयाण तर माझं घर आहे जिथे मी राहतोय..तिथे माणसांचा वावर आहे पण सहवास नाही....<br />तुझा सहवास मिळणार असेल तर मी...मी इथे राहयला तयार आहे... तेंव्हाच दूर देवळात आरतीची घंटा वाजली त्या निरव शांततेत ती ताल धरून घुमली... आणि मी तोच कौल समजलो...</div>
Ashish Gosavihttp://www.blogger.com/profile/17619718332320901865noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-2527762802261629927.post-88689382897333227892014-05-17T12:49:00.000-07:002014-05-17T13:22:10.222-07:00कौल..<div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on">
<br /><br />घटना आणि प्रसंग यात काय फरक आहे?<br /><br />घटना घडून जाते आणि प्रसंग लक्षात राहतो, त्यात एक अनुभव असतो जो आपल्याला विचार करायला भाग पाडतो गूंतवून ठेवतो<br /><br />आमच्या डाँक्टरला म्हणजे विनायकला म्हणजे डाँ. विनायक पाटकरला काल परवा असाच एक अनुभव आला...<br /><br />नाँर्मल या शब्दाचा अर्थ आपण सामान्य असा घेतो आणि सामान्य म्हणजे मला नेहमी चार चौघांसारखे असा वाटतो आणि तो काही प्रमाणात खराही आहे...<br /><br />आपण सगळे गर्दीत मिसळून जायचा प्रयत्न करतो. चार चौघांसारखे वागायचा प्रयत्न करतो तरी डाँक्टर सारखी माणसं वेगळी उठून दिसतातच<br />परवा आमचा डाँक्टर नेहमीप्रमाणे दवाखान्यात जायला निघाला सकाळची वेळ तशी घाईची वेळ प्रत्येकाला कुठे ना कुठे वेळेत पोहोचायचं असतं अशावेळी हाय हँलो करायचाही मूड नसतो किंवा तयारी नसते<br />त्यात नातेवाईक दिसले तर भले भले कल्टी मारताना मी पाहिले आहेत पटकन रस्ताच बदलतील, पानपट्टीचा आडोसा घेतील, चालायचा वेग कमी करतील, तंद्रीत असल्यासारखं दाखवतील..पून्हा नातेवाईकाला टाळलं यात फुशारकी मानणारे महाभाग ही मी बघितले आहेत... मला काय म्हणायचय, घाई हा तुमचा नाईलाज होऊ शकतो पण ती तुम्ही तुमची हुषारी कशी समजता?<br />पण आमचा डाँक्टर खरच हुषार असला तरी साधा आहे<br />तर काय झालं, डाँक्टर दवाखान्यात जायला निघाला ,रस्त्याला लागला आणि काही अंतरावर त्याचा मामा त्याला दिसला... थकलेला वयस्कर,पार्कींसंस चा त्रास असलेला,एकटाच निघाला होता वसईला राहणारा मामा इतक्या सकाळी इथे काय करतोय? आणि चारकोपला आला तर घरी कसा आला नाही? म्हणून डाँक्टर कासावीस झाला... चक्क चार पावलं धावला त्याने मामाला आडवलं<br />पण पाहिलं तर तो दुसराच कोणी होता... सेम टू सेम मामा सारखे दिसणारे ते ग्रुहस्थ निमूट आपल्या वाटेने चालले होते<br />विनूने थांबवल्यावर ते थांबले त्याना बघून डाँक्टरच्या लक्षात आलं तो जरा खजील होत म्हणाला माफ करा हं! मला वाटलं माझा मामाच चालला आहे.. म्हणून मी धावत येऊन अडवलं<br />ते वयस्कर ग्रुहस्थ जरा हसले... म्हणाले वा वा बरं वाटलं मामाला रस्त्यात बघून धावत येऊन थांबवणारे भाचे अजून आहेत... नाहीतर आमचं नशीब<br />दोन दोन मुलगे आहेत पण एकाला बापा बरोबर दवखान्यात यायला वेळ नाही<br />पार्कंसंन सारखा आजार सांभाळत खुरडत खुरडत आम्हीच डाँक्टरांकडे जातो... जगायला तर हवच नाहीतर हिच्याकडे कोण बघणार?<br />संवादच खुंटला... आणखी एका शब्दाने संभाषण वाढवणं दोघानाही अशक्य झालं त्यातला फोलपणा दोघानाही जाणवला...पण डाँक्टर त्याना जाताना बघून अस्वास्थ झाला..हा प्रसंग खूप काही सांगून जातो नाही का?<br />मामाला बघून त्याला भेटायला धवणारे भाचे आहेत अजून.. अगदी निराशजनक चित्र नाही<br />आणि त्यात आता ग्रुहं संकूल उभं करताना संकुलातच व्रुद्धाश्रम उभं करण्याची कल्पक योजना सुचली आहे... झाकली मूठ सव्वा लाखाची राहयला मदत होईल<br />आमच्या डाँक्टरच्या अस्वस्थतेला देवाने दिलेला कौल आहे.. कारण तसा आमचा डाँक्टर देवभोळा सुद्धा आहे...</div>
Ashish Gosavihttp://www.blogger.com/profile/17619718332320901865noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-2527762802261629927.post-12861699052835654572014-05-17T12:48:00.001-07:002014-05-17T13:22:26.187-07:00गाभारा… <div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on">
<br /><br />जगात देव आहे हे मी आता ठामपणे सांगू शकतो, आता या बद्दल दुमत नाही वाद घालायचं सुद्धा कारण नाही, कोणी म्हणले दर्शन झालं का?.. नाही पण साक्षातकार झाला... अत्ता मी मारुतीला गेलो होतो तसा रोजच जातो..पण आज शनिवार ना? मारुतीचा वार... नेहमी येणार्या भक्तांपेक्षा शनिच्या भितीने भक्तीभावाने जमा होणारे भक्त जास्त असतात... अठरापगडचे भक्त, दाही दिशातून आलेले..त्यांची भक्ती म्हणजे काय विचारता? देऊळ छोटेखानी त्यात रस्त्याला लागून, प्रवासी बसेसची सतत ये जा श्रीमंत भक्त अर्थात गाडीने येतात ड्रायव्हरने शक्यतो देवळाच्या समोर सोडावं हा त्यांचा आग्रह मालकाला सोडून गाडिवान यु टर्न घेऊन जाणार त्यासाठी थोडा अवधी लागतोच आमच्यासारखे सामान्य तिथेच आपले रांगेत उभे... जो पर्यंत रांगेत असतो तो पर्यंत ठीक पण जस जसं गाभार्यापाशी पोहोचतो आमची भक्ती मनात उचंबळून यायला लागते.एकच झूंबड उडते त्यात गाभार्या समोर तेल सांडलेलं तेल उगाच सांडत नाही त्यालाही दुर्ल्क्षीत अनेक कारणं आहेत एक म्हणजे रांग पुढे सरकत असतानाच आमच्या हातात नारळ रुईच्या पानांचा हार उदब्त्ती उडीद शेंदूर घातलेल्या तेलाची वाटी लिंबूमिरची कोळसा असं काय काय दिलं जातं त्यात लहान मुलं असतील तर दहामुलांपैकी चार मुलं तेलाची वाटी हातात धरायचा हट्ट करतात बाल हट्टच तो पण तो कधी कुठे कसा पुरवायचा याला नियम नाही,चार पैकी दोघे पालक त्यामुलांच्या हातात तेलाची छोटी वाटी देतात रांगेतले भक्त चुळभुळत असतातच त्यात प्रदक्षिणा घालणारे जोरावर आलेले असतात. त्यात ते ही एक प्रदक्षिणा घालून गप्प बसत नाहीत. अकरा एकवीस एकावन्न प्रदक्षिणा घालणारे महाभाग आहेत भेदभाव करायचा नाही पण निरिक्षणावरून सांगतो यु पी चे लोक भक्ती इतरांवर लादतात.. आता इतक्या प्रदक्षिणा पूर्ण करायच्या तर त्याना लिटरली धावावं लागतं मग कोणाला धक्का लागला कोणाच्या पायावर पाय पडला तर काय झालं? असा त्यांचा अविर्भाव असतो.. या धावपळीत हमखास तेल सांडतं.. साऊथ इंडीयन असतात त्याना प्रदक्षिणे पेक्षा नमस्कार करण्यात जास्त भाव जाणवतो मग कोणी तिथेच तीन वेळा साष्टांग नमस्कार घालतं कोणी लोटंगण घालतं आता मारवाडी लोक जे आहेत ते मुर्तीसमोरून बाजूला होताना म्हणे देवाला पाठ दाखवत नाहीत, किती विनोदी प्रकार? देवाला पाठ दाखवायची नाही म्हणून चार पावलं ते उलटे मागे येतात म्हणजे बघाहं ! आधी प्रदक्षिणा घालणारे धावत असतात त्यात तेल सांडून सांडून जमीन पच्यपचीत झालेली असते निसरडी झालेली असते. लोटांगण घालणारे पडलेलेच असतात त्यात हे उलटे चार पावलं मागे येणारे मागे येतच असतात कल्पना करा अपघात कसा होऊ शकतो पण बरेचदा होत नाही,का? कारण देव तिथे हजर असतो तेलाची वाटी मुर्तीवर रीती करताना त्यातला शेवटचा उडीदही मुर्तेच्या शिरावर पडावा म्हणून टणा टणा मुर्तीवर वाटी आपटतात तो पर्यंत ते मागे हाटत नाहीत.. मग नारळ वाढवायचा असतो नारळ नुसता अर्पण करून चालत नाही कारण मग अर्धी वाटी मिळत नाही आणि काही काहींच्या घरी म्हणे अर्धी वाटी घरी नेल्याशिवाय घरात घेत नाहीत कारण दुसर्या दिवशी रविवार असतो.काहीजण छोटीवाटी मोठी वाटी असं परिक्षण उभ्या उभ्या करतात पण ते करायला तिथेच उभे असतात आणि त्यात रविवारी नारळ लागतोच.<br />त्यात परत नुसता नारळ वाढवून चालत नाही, नारळातलं पाणी आधी चारही दिशाना उडवायचं उरलेलं मुर्तीवर शिंपडायचं त्यासाठी ते पाणी सांडून संपायच्या आत फोडलेला नारळ घेऊन धावत जाऊन गाभारा गाठायचा तिथे आँलरेडी मुर्तीसमोर कोणीतरी ओंणवा असतोचपण त्या आधी तेल सांडलेल्या जमिनीवर नारळाच्या पाण्याचाही अभिषेक होतो चिकचिक वाढते त्यात यु पीची किती माणसं वाढली आहेत त्या प्रमाणात भक्तही वाढलेत पण निव्वळ तिथे देव अवतिर्ण होऊन ट्रँफिक पोलीसचं काम करत असावा म्हणून आमच्यासारखे बचावतात त्यात आणखी एक रिवाज आहे दक्षिणेकडचे काही भावीक तिथल्यातिथे नारळावर कापूर ठेऊन देवाला ओवाळतात.. तर काही महाभाग नारळाची शेंडी मुर्तीसमोरच्या दिव्यावर धरतात शेंडी चांगली शिलगे पर्यंत तिथून हाटत नाहीत कधी कधी ती शेंडी पेट घेते मग धावत जाऊन तो नारळ वढवायचा... हे सगळे रिवाज झाले भक्ती कुठे आली? भाव कुठे आला? तरीही तो निर्विकार राहून सगळ्याना सांभाळतो याचा अर्थ तो आहे की नाही?<br />मला खरच सगळ्याचा उबग आलाय..खास करून कणकेचे अकरा एकवीस एकावन्न दिवे लावणारे सुद्धा महाभाग आहेत ते ही म्हणे चढत्या उतरत्या क्रमाने.. ते दिसतात छान पण अपघाताचा विचार केला तर ते घातकच आहेत... खरच हे रिवाज ह्या पद्धती कोणी आणि का पाडल्या असतील सिव्हिल सेंस आपण इथे वापरत नाही तर तिर्थस्थानाला भेट देताना आपलं काय होत असेल काहीजण देवाला त्रास दिला की तो ऐकतो म्हणत मारुतीला मीठ फासतात किती अमानुष आहे हे... त्यासाठी खडे मीठ लागतं ते जमिनीवर सांडलं तर ते पायाला टोचतं भय्येलोकांसाठी खास चमेलीचं तेल विकायला असतं त्या तेलाच्या रिकाम्या बाटल्या भावीक(?) तिथेच टाकून जातात इतक्या गडबडीत तेलाच्या वाटीत आपला चेहरा एकाग्रपणे शोधत किंवा बघत काहीजण उभे असतात त्याना सांभाळण्याची जबाबदारी देवालाच घ्यावी लागते<br />त्यात भिकार्यांचा उपद्र्व पावसाची जोरदार सर आली तर ते सुद्धा देवळाच्या आसर्याला येतात त्यात भटकी कुत्री आहेतच आणि हे सगळं निस्तरायला मला वाटतं तो गाभारा सोडून सगळ्यांची काळजी घ्यायला बाहेर अवतीर्ण होतो.</div>
Ashish Gosavihttp://www.blogger.com/profile/17619718332320901865noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-2527762802261629927.post-56185431932612309382014-05-17T12:19:00.000-07:002014-05-17T13:22:46.228-07:00मातीच्या गोष्टी…. <div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on">
लहानपणी आई एक गोष्ट अगदी रंगवून रंगवून सांगायची,आणि आम्हीही ती माहीत असलेली गोष्ट पून्हा पून्हा तितक्याच उत्कंठेने ऐकायचो... आता मला माहीत असलेली गोष्ट मी तुम्हाला सांगणार नाही असं होईल का?<br />तर एका गावा बाहेर एक साळीचं शेत असतं.चंडोलपक्षानं त्या पिकामधे आसरा घेत पिल्लांसाठी घरटं बांधलेलं असतं<br /> चंडोल पक्षाचं घरटं असलं तरी त्याचा पत्ताच नसतो त्याची मादीच आपली तीन पिल्लाना सांभाळत त्या घरट्याची रखवाली ...करत असते. पिल्लाना चारा आण, किडॆ आण, टोळ मिळाला तर तो आणून भरव, कुठे काडी निसटली तर ती ठीक कर कापूस आणून भर, पिल्ल आपली बघावं तेंव्हा चोच आवासून आपल्या आईची वाट बघत असायची<br /> ती पक्षीणी पिल्लं जरा मोठी झाल्यावर त्याना सांगते, घाबरायचं नाही कोणाची चाहूल लागली तर गप्प बसायचं कोण काय बोलतय, कसे आवाज काढतय सगळ्यावर लक्ष ठेवायचं<br /> काही महत्वाचं वाटलं तर माझ्या कानावर घालायचं. पिल्लं आपली त्यांच्या भाषेत हो हो म्हणत माना डोलावतात. कुठेही जा माना डोलवणं सेमच असतं नाही.. आपण सुद्धा... असो! तर एकदा काय होतं?<br />त्या शेताचा जमीनदार शेताची पाहणी करायला शेतात फेरफटका मारायला येतो. बरोबर त्याचा लोचट मुनीमजी असतोच. तयार झालेलं शेत बघून जमिनदार म्हणतो "हं! शेत कापायला झालय, आता कापायला हवं... पिल्ल घाबरतात.. हे आईच्या कानावर घलायला हवं शेत कापलं तर आपण कुठे जायचं? आई आल्या आल्या पिल्ल कलकलाट करतात पण ते ऐकून आई आपली शांतच. पिल्ल विचारतात, आई तुला भिती नाही वाटत? आई म्हणते अजून नाही पण तुम्ही मात्र सावध रहा शब्दंशब्द ऐका आणि मला सांगा काही दिवस जातात पून्हा जमिन्दार येतो सोबत मुनीनजी असतोच<br /> जमिनदार म्हणतो अरे आता शेत कापायला घ्यायला हवं जरा त्या शिरप्याला विचारा म्हणावं जरा कापून दे... पिल्ल हे ऐकातात तत्परतेने आईच्या कानावर घलातात तरी आई आपली शांतच<br /> परत थोडे दिवस जातात शेत तसच डुलत असतं पिल्लं वाढत असतात पण अजून पंखात बळ येणं बाकी असतं त्या दरम्यान जमिनदार असाच फेर्या मारून जातो पाहणी करून जातो देवदयेनं या घरट्याकडे त्याचं लक्ष जात नाही. याला सां गा त्याला सांगा करण्यात समय जात असतो.<br />आणि एक दिवस जमिनदार येतो त्याच्या बरोबर त्याचा मुलगाही असतो कोणा कोणाला शेत कापायला सांगितलं याची उजळणी होते नोकर चाकर गडी माणसं,गावातली माणसं... शेवटी मुलगा म्हणतो जाऊदे अप्पा! आता उद्या अपणच येऊया आणि शेत कापायला घेऊया कशाला कोण हवय?<br />आई आल्या आल्या पिल्लं तिला हे सांगतात आणि जेंव्हा ती हे ऐकते की आता कोणावरही अवलंबून नं राहता जमिनदार स्वत:च शेत कापायला घेणार आहे तेंव्हा मात्र ती आई अस्वस्थ होते पिल्लाना दाखवत नाही पण जरा घाबरते<br />.. पिल्लं विचारतात..आई काय झालं?विचारात पडलेली ती आई म्हणते.. इतके दिवस ते दुसर्या कोणाची वाट बघत होते तो पर्यंत काळजी नव्हतीपण आता ते स्वत:च शेत कापणार म्हणजे.आपली इथून हलायची वेळ झाली. <br />पहाटेलाच पिल्लाना म्हणते जरा उडायचा प्रयत्न करा त्यानिंबावर जाऊन बसा .. आणि आईच्या इशार्या बरोबर ती पिल्लं घरटं सोडतात... कसाबसा जवळचा निंब गाठतात<br /> माँरल आँफ द स्टोरी काय? स्वत:च्या कामासाठी स्वत:लाच उभं राह्वं लागतं<br /> माझं कपाट आवरायची वेळ आलीकी राहून राहून मला ही गोष्ट आठवते.. तात्पर्य काय तर उद्या बहुतेक आपली भेट होणे नाही...</div>
Ashish Gosavihttp://www.blogger.com/profile/17619718332320901865noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-2527762802261629927.post-29660858577153537752014-05-17T12:16:00.001-07:002014-05-17T12:16:43.644-07:00केळवण… <div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on">
<span style="background-color: white; color: #333333; font-family: 'lucida grande', tahoma, verdana, arial, sans-serif; font-size: 14px; line-height: 20px;">घटना आणि प्रसंग यात काय फरक आहे?</span><br style="background-color: white; color: #333333; font-family: 'lucida grande', tahoma, verdana, arial, sans-serif; font-size: 14px; line-height: 20px;" /><span style="background-color: white; color: #333333; font-family: 'lucida grande', tahoma, verdana, arial, sans-serif; font-size: 14px; line-height: 20px;">घटना घडून जाते आणि प्रसंग लक्षात राहतो, त्यात एक अनुभव असतो जो आपल्याला विचार करायला भाग पाडतो गूंतवून ठेवतो</span><br style="background-color: white; color: #333333; font-family: 'lucida grande', tahoma, verdana, arial, sans-serif; font-size: 14px; line-height: 20px;" /><span style="background-color: white; color: #333333; font-family: 'lucida grande', tahoma, verdana, arial, sans-serif; font-size: 14px; line-height: 20px;">आमच्या डाँक्टरला म्हणजे विनायकला म्हणजे डाँ. विनायक पाटकरला काल परवा असाच एक अनुभव आला...</span><br style="background-color: white; color: #333333; font-family: 'lucida grande', tahoma, verdana, arial, sans-serif; font-size: 14px; line-height: 20px;" /><span style="background-color: white; color: #333333; font-family: 'lucida grande', tahoma, verdana, arial, sans-serif; font-size: 14px; line-height: 20px;">नाँर्मल या शब्दाचा अर्थ आपण सामान्य असा घेतो आणि सामान्य म्हणजे मला नेहमी चार चौघांसारखे असा वाटतो आणि तो काही प्रमाणात खराही आहे...</span><br style="background-color: white; color: #333333; font-family: 'lucida grande', tahoma, verdana, arial, sans-serif; font-size: 14px; line-height: 20px;" /><span style="background-color: white; color: #333333; font-family: 'lucida grande', tahoma, verdana, arial, sans-serif; font-size: 14px; line-height: 20px;">आपण सगळे गर्दीत मिसळून जायचा प्रयत्</span><span class="text_exposed_show" style="background-color: white; color: #333333; display: inline; font-family: 'lucida grande', tahoma, verdana, arial, sans-serif; font-size: 14px; line-height: 20px;">न करतो. चार चौघांसारखे वागायचा प्रयत्न करतो तरी डाँक्टर सारखी माणसं वेगळी उठून दिसतातच<br />परवा आमचा डाँक्टर नेहमीप्रमाणे दवाखान्यात जायला निघाला सकाळची वेळ तशी घाईची वेळ प्रत्येकाला कुठे ना कुठे वेळेत पोहोचायचं असतं अशावेळी हाय हँलो करायचाही मूड नसतो किंवा तयारी नसते<br />त्यात नातेवाईक दिसले तर भले भले कल्टी मारताना मी पाहिले आहेत पटकन रस्ताच बदलतील, पानपट्टीचा आडोसा घेतील, चालायचा वेग कमी करतील, तंद्रीत असल्यासारखं दाखवतील..पून्हा नातेवाईकाला टाळलं यात फुशारकी मानणारे महाभाग ही मी बघितले आहेत... मला काय म्हणायचय, घाई हा तुमचा नाईलाज होऊ शकतो पण ती तुम्ही तुमची हुषारी कशी समजता?<br />पण आमचा डाँक्टर खरच हुषार असला तरी साधा आहे<br />तर काय झालं, डाँक्टर दवाखान्यात जायला निघाला ,रस्त्याला लागला आणि काही अंतरावर त्याचा मामा त्याला दिसला... थकलेला वयस्कर,पार्कींसंस चा त्रास असलेला,एकटाच निघाला होता वसईला राहणारा मामा इतक्या सकाळी इथे काय करतोय? आणि चारकोपला आला तर घरी कसा आला नाही? म्हणून डाँक्टर कासावीस झाला... चक्क चार पावलं धावला त्याने मामाला आडवलं<br />पण पाहिलं तर तो दुसराच कोणी होता... सेम टू सेम मामा सारखे दिसणारे ते ग्रुहस्थ निमूट आपल्या वाटेने चालले होते<br />विनूने थांबवल्यावर ते थांबले त्याना बघून डाँक्टरच्या लक्षात आलं तो जरा खजील होत म्हणाला माफ करा हं! मला वाटलं माझा मामाच चालला आहे.. म्हणून मी धावत येऊन अडवलं<br />ते वयस्कर ग्रुहस्थ जरा हसले... म्हणाले वा वा बरं वाटलं मामाला रस्त्यात बघून धावत येऊन थांबवणारे भाचे अजून आहेत... नाहीतर आमचं नशीब<br />दोन दोन मुलगे आहेत पण एकाला बापा बरोबर दवखान्यात यायला वेळ नाही<br />पार्कंसंन सारखा आजार सांभाळत खुरडत खुरडत आम्हीच डाँक्टरांकडे जातो... जगायला तर हवच नाहीतर हिच्याकडे कोण बघणार?<br />संवादच खुंटला... आणखी एका शब्दाने संभाषण वाढवणं दोघानाही अशक्य झालं त्यातला फोलपणा दोघानाही जाणवला...पण डाँक्टर त्याना जाताना बघून अस्वास्थ झाला..हा प्रसंग खूप काही सांगून जातो नाही का?<br />मामाला बघून त्याला भेटायला धवणारे भाचे आहेत अजून.. अगदी निराशजनक चित्र नाही<br />आणि त्यात आता ग्रुहं संकूल उभं करताना संकुलातच व्रुद्धाश्रम उभं करण्याची कल्पक योजना सुचली आहे... झाकली मूठ सव्वा लाखाची राहयला मदत होईल<br />आमच्या डाँक्टरच्या अस्वस्थतेला देवाने दिलेला कौल आहे.. कारण तसा आमचा डाँक्टर देवभोळा सुद्धा आहे...</span></div>
Ashish Gosavihttp://www.blogger.com/profile/17619718332320901865noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-2527762802261629927.post-82344879993123145782014-03-21T03:00:00.000-07:002014-03-19T12:02:18.711-07:00Facebook and Feelings<div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on">
<span style="color: #eeeeee;"><br /><br />feeling (फीलिंगस् )<br /><br />feelings ह्या शब्दाचा अर्थ वळवताच येत नाही अनि “ दोस्ती , प्रेम अनि सहज , असच “ ह्या शब्दातूनच हा शब्द जातो “feelings “ . कधी घडली असेल तुमच्या बरोबर “हो” अनि “नाही “ स्वतालाच विचारा .......अशीच एक “ feelings” ...........<br />योग योग आहे का खरच योग माहित नाही पण माझ्या गोष्टी सर्व fb (facebook) वरच येतात, आता मनात येतो म्हणून लिहितो म्हणून हा योग होतो ...........<br /><br /><br />facebook वर “ती” खूप दिवसा पासून add होती पण कधी बोलत नसे ,मी पण तिला “message” करून थकलो अनि “ hopes” सोडून बसलो होतो ..एक दिवस “ reply” आला अन् त्यच दिवशी online भेटली. fb वरच normal बोलन ........</span><br />
<div>
<span style="color: #eeeeee;">मी :- hiiiiiii..........<br /><br />ती :- hiiiiiii..................<br /><br />........<br /><br />मी:- कशी आहेस अनि आज online कशी ?<br /><br />ती :- असते कधी कधी अनि मी ठीक आहे ......(उत्तरावरून attitude girl वाटली )<br /><br />मी :- okz......हो पण माझ्या एका पण msg चा reply नाही केला.<br /><br />ती:- reply करायचा असतो .......<br /><br />मी:- कल्याण .....<br /><br />ती :- काय “कल्याण” ?<br /><br />मी:- नाही मी “कल्याण” ला राहतो तू कुठे राहते ?<br /><br />ती :- नवीमुंबई ......<br /><br />मी:- gud मग fb कधी पासून आहे ...?<br /><br />ती :- खूप नाही 6 months ......<br /><br />मी :- अनि chat करते का नाही ?<br /><br />ती :- नाही .......तेवढी मी बसतच नाही ....<br /><br />मी :- okz.....<br /><br />ती :-झाल का आपण नंतर बोलू मी जाते आता ......?<br /><br />मी:- एवढ्या लवकर .........<br /><br />ती :- नसीब मी बोलले तरी ......:)<br /><br />मी :- ohhhh......as u wish ........<br /><br />ती :- byeeeeee<br /><br />मी :- tc ......<br /><br /> <br /><br />रोज online भेटायची अनि time झाल कि attitude मध्ये निघून जायची पण बोलताना माझ्या मनावर हावी असायची .एक दिवस असाच बोलताना ती oflline झाली. reply बंद म्हणून नेहमी प्रमाणे गेली म्हणून मी वाट बघायची सोडून मी पण logout झालो ..........<br /><br />थोड्याच वेळात unknown no . वरून friendship msg आला..... मी मनातल्या मनात वाह..... आता हा no . कोणाचा म्हणून फोन लावला तर cut , दुसऱ्यांदा cut , तिसर्यांदा cut , चौथ्य्न्दा मीच cut-cut बंद केली. अनि थोड्याच वेळात त्या नंबर वरून फोन आला . मी विचारलं whos this ?<br /><br />ती :- ओळख ......<br /><br />मी :- कस ओळखू ........?<br /><br />ती :- ते तुज बघून घे ......<br /><br />मी :- अस कस ......?<br /><br />ती :- असच ?<br /><br />मी :- तुझं नावाचा पहिला अक्षर सांग अनि ,..शेवटच .......<br /><br />(तिने सांगितलं अनि मी ओळखल पण )<br /><br />ती :- मी direct offline झालो .तुला राग आला असता ना ......म्हणून मी msg केला .........<br /><br />मी :- ohhhh......अस काय ?<br /><br />ती :- चल झाल बोलून नंतर वेळ भेटला तर बोलेन नाही तर नाही .......<br /><br />मी :- मी “msg” करेन ना ......<br /><br />ती :- कशाला ......मी सहज फोन केला होता.......<br /><br />मी :- okz........चांगल आहे तुज .........<br /><br />अनि फोन कट झाला .......खरा खेळ तर आता सुरु झाला होता “feelings “ चा ......मला राग येईल म्हणून फोन केला होता पण लगेच तो कट पण केला ....पण २-३ दिवसांनी तिचे msg यायला सुरवात झाली मग मी पण msg करू लागलो .......<br /><br /> <br /><br />“ गोड गोड गोडवी .....<br /><br />मन भरून जावी .....<br /><br />शब्द च नाही वळत ...<br /><br />हि feeling च नाही कळत ........”<br /><br /> <br /><br />“ hiiii.........hellooooo...<br />..</span></div>
<div>
<span style="color: #eeeeee;">how r u ............</span></div>
<div>
<span style="color: #eeeeee;">कशी आहेस ...? कसा आहेस तू ?</span></div>
<div>
<span style="color: #eeeeee;">ह्या शब्दन मध्ये लपलेली .....</span></div>
<div>
<span style="color: #eeeeee;">हि feeling च नाही कळत ........”<br /><br /> <br /><br />असाच दिवस–रात्र msg वर बोलायचो ...पण एक दिवस मीच विचारलं .......<br /><br />मी :- hellllooooo मला काही तरी सांगायचं आहे .....?<br /><br />ती :- मला माहित आहे तुला काय बोलायचं आहे .....<br /><br />मी :- मग तुज उत्तर काय असेल .......<br /><br />ती :- हे बघ उत्तर काही पण असल तरी आपण असे जास्त दिवस नाही बोलू शकत .........<br /><br />मी :- अस का ?<br /><br />ती :- असाच आहे अनि खर आहे ?<br /><br />मी:- sorry मी माझ्या feelings चुकून मांडल्या ......<br /><br />ती :- i recept ur feelings ..... अनि sorry ........ उद्या पासून मला msg पण नको करत जाऊ ...,,मला त्रास होतो ..... thanks for very nice friendship .................<br /><br /> <br /><br />तिने फोन कट केला अनि मी पण “कट” झालो .......त्या दिवसा पासून तिचा फोन च नाही लागला अनि facebook अनि friendship अनि feelings चा असा end झाला ........<br /><br />तिने अस का केल मला नाही समजल ......तुम्हाला समजेल किवा नाही पण शेवटी राहते ती “FEELINGS” ......<br /><br /> <br /><br />“ “ मी अनि “ती “ मध्ये ......<br />तीच लांब झाली ........<br />एकट पडलेल्या मनाला हेच नाही वळत .......<br /><br />हि वेगळी अशी “feeling “ च नाही कळत......</span><br />
<div class="separator" style="clear: both; text-align: center;">
<a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhDhP_fVOc7YGalFirlA1vm13yXwptUfcNqt-eyWs6CDFzfH4ipP8I12pWkR8iWVzJ7Bv9EMRnYmAUqPI_p5BHw5I0am0gCoiaYoUHncjYnownAhyphenhyphenISFESoRMpm32JscLJ24TA1kRdovlo/s1600/385357_468882986506812_621168571_n.jpg" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"><img border="0" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhDhP_fVOc7YGalFirlA1vm13yXwptUfcNqt-eyWs6CDFzfH4ipP8I12pWkR8iWVzJ7Bv9EMRnYmAUqPI_p5BHw5I0am0gCoiaYoUHncjYnownAhyphenhyphenISFESoRMpm32JscLJ24TA1kRdovlo/s1600/385357_468882986506812_621168571_n.jpg" height="320" width="320" /></a></div>
</div>
</div>
Ashish Gosavihttp://www.blogger.com/profile/17619718332320901865noreply@blogger.com0Ganesh Nagar, Sector 3, Belpada, Kharghar, Navi Mumbai, Maharashtra 410210, India19.029523047918119 73.0603265762329119.027646547918117 73.05780507623291 19.03139954791812 73.06284807623291tag:blogger.com,1999:blog-2527762802261629927.post-42859923917025433462014-03-19T06:44:00.000-07:002014-03-19T13:57:24.648-07:00ती आणि तिचा शिवाजी ... !<div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on">
<br />
<div class="separator" style="clear: both; text-align: center;">
</div>
<span style="color: #d9d2e9;">ती आली कि आमच्या घरी कि नियम आहे, तिला घेऊन दुकानात जायचं<br />आणि मस्तपैकी drawing बुक आणि भरपूर sketch पेन्स घ्यायचे,<br />ती आज आली आणि आम्ही दोघे ठरल्याप्रमाणे निघालो खरेदीला...<br />तिचा एक नियम आहे, माझ बोट तिने<br />नाही धरायचं मी तीच बोट धरून चालायचं...<br />चौकात पोहचलो...<br />आज सेनेची शिवजयंती मोठ्याने स्पीकर वर<br />"आनंदवन भुवनी..." अस गाण चालू... रस्ता क्रॉस<br />करता करता तिचा प्रश्न -" काका, आज शिवाजी महाराजांचा बर्थडे<br />आहे का?" मी आपल "हो" म्हणून सांगितलं...<br />मग<br />तिचा पुढचा प्रश्न "मागच्या महिन्यात तर झाला त्यांचा बर्थडे,<br />आपणच नाही का गेल्तो, दोन दोन बर्थडे ? म्हणजे दोनदा जन्मले का?"<br />मी जरा मोठ्याने हसत म्हंटल " नाही ग बेटा, दोनदा कसे<br />जन्माला येतील, एक माणूस एकदाच जन्माला येतो,पुन्हा नाही..."<br />"मग दोन दोन बर्थडे कसे" तिचा प्रश्न अजून बाकी होता.<br />" मी शिवाजी महाराजांना पाहिलं नाही, तू पण पाहिलं नाही... आज<br />जे जे आहेत त्यांनी कुणीच पाहिलं नाही... खूप खूप वर्ष होऊन गेले<br />त्यांना, त्यांचा जन्म कधी झाला याचा खूप लोकांनी शोध<br />घेतला आणि मग त्यांना तारीख सापडली....ती तारीख म्हणजे<br />मागच्या वेळी आपण साजरी केल ते... आता काही लोकांना हे मान्य<br />नव्हत... त्यांनी तारीख ही आपली भानगड नाही म्हणून<br />तिथी नुसार चालू केली जयंती...."<br />"हम्म " म्हणत तिला ते कळाल नाही अस दाखवून दिल... मग<br />मी अजून सोप्प करून सांगाव म्हणून प्रयत्न करू लागलो "<br />शिवाजी महाराज मोठे माणूस होते कि नाही, प्रत्येक जण<br />म्हणतो ते आमचेच... म्हणजे ते<br />अश्या मोठ्या लोकांची चोरी करतात आणि मग त्यांच्या नावावर<br />खोट खोट सांगत फिरतात."<br />माणस चोरतात हे तिला नवीनच वाटल, ती खळाळून हसली "<br />माणस चोरतात? म्हणजे शिवाजी महाराजांना पण चोरलं?"<br />ती पुन्हा हसली... मी ही तिच्या हसण्यात सहभागी झालो...<br />ती शिवाजी महाराजांच्या मूर्तीकडे बोट दाखवत म्हणाली "<br />हा पुतळा नाही आवडत मला"<br />" अग शिवाजी महाराजांचा आहे तो, तुला आवडत<br />नाही का शिवाजी महाराज?" मी विचारल.<br />" आवडतात ना काका, पण हे अस घोड्यावर बसून तलवार घेतलेले नाही"<br />" मग कसे आवडतात" आता काही तरी नवीनच ऐकायला मिळणार<br />म्हणून मी उत्सुक झालो.<br />" तो नाही का तुझ्याकडे जिजामाता आणि बालशिवाजी शेतात नांगर<br />ओढतानाचा फोटो आहे तो आवडतो मला"<br />आम्ही घरी पोहचलो होतो...<br />"जा आता चित्र काढा" म्हणून<br />तिला घरात सोडलं... </span><span style="color: #d9d2e9;">मी पुन्हा चौकात येउन</span><br />
<div>
<span style="color: #d9d2e9;">शिवाजी महाराजांचा पुतळा न्याहाळू लागलो....<br />त्यांची भावमुद्र प्रचंड रागीट वाटत होती....</span></div>
<div class="separator" style="clear: both; text-align: center;">
<a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjVnIpYRFEh8LWGvZLsnI9s2vteL5pXzXq0x6CE4jLfDWxygFK4TEv2aNPhREIc_x89IK5Vmube3864zpSn5ww0-0EcP-LyT-jMPBY76JMb7DLLtLlDErATiVWHXGdGeMQYDuSOLjWK_UE/s1600/Picture+070.jpg" imageanchor="1" style="clear: right; float: right; margin-bottom: 1em; margin-left: 1em;"><img border="0" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjVnIpYRFEh8LWGvZLsnI9s2vteL5pXzXq0x6CE4jLfDWxygFK4TEv2aNPhREIc_x89IK5Vmube3864zpSn5ww0-0EcP-LyT-jMPBY76JMb7DLLtLlDErATiVWHXGdGeMQYDuSOLjWK_UE/s1600/Picture+070.jpg" height="300" width="400" /></a></div>
</div>
Ashish Gosavihttp://www.blogger.com/profile/17619718332320901865noreply@blogger.com0