Saturday, May 17, 2014

वृंदावन…



कधिचं बंद पडलेलं कारंजं होतं तिच्या दारापुढे, तसं दारही सतत बंद असायचं

खिडकिचंएक दार उघडं तर एक बंद असायचं जाळी जरा फाटलेली म्हणून घरातलं थोडं दिसायचं ,

दिसण्यासाठी घरात होतं काय म्हणा.. ती बसायची ती मोडकी खुर्ची आणि कलंडत्या टेबलावर कधीचा राहून गेलेला पेला त्यातलं पाणी सुद्धा आता वाळून गेलं ती गेली तेंव्हा तिचा घसाही कोरडा होता.. पाणी समोर होतं पण म्हणे प्यायचं तिच्या लक्षातच आलं नाही.. दिवसभर तसा अंधारच असतो घरात.. रात्री जास्त गडद होतो इतकच.. कसली चाहूल नाही हालचाल नाही, आधी ती होती तेंव्हा किंवा ती असे पर्यंत एक मांजर तिच्या पाशी अंगाचं मुटकुळं करून बसायची पण ती ही स्तब्ध शांत.... ती तग धरू शकली नाही तर तो मुका जीव कुठला तग धरायला...आता माजलेल्या पाली सर्र्कन सरकतात मनत चर्र होतं,पण पालींचं सरपटणं ते कसलं? कीडा मुंगी बघून सरपटणार त्या... त्याने कधी हालचाल होते का?.....कुबट वास भरून राहिलाय त्या वास्तूत.. दाराशी गेलं की जाणवतो .म्हणे तिच्या राहून गेलेल्या समानाचा असेल.. तिच्या गावाला गेलो की मी डोकावतो कधी कधी तिच्या घरात,.. आणि तिच्या गावाला काय ,तिच्या घरात डोकावण्यासाठीच मी जातो.... आता कसली ओढ आहे कोणजाणे... तेंव्हा जमलं नाही... आणि आता..
तसे इथले गावकरी सांगतात वेळी अवेळी येऊ नका ती अजूनही कोणाकोणाला दिसते अंगावर चवताळून येते... जिवंतपणी जे जमलं नाही ते तिला गेल्यावर कसं जमेल?
पण मी कोणाशी फार बोलत नाही, नाहीतर माझ्याच तोंडून निघायचं तिने ही वास्तू माझ्याच नावावर केल्याचं.. नसते प्रष्न उभे राहयचे ते विचारायला आणखी चारजण यायचे
चारजणाना कळलं तरी हरकत नाही..
पण माझ्या मुलाना कळायला नको... हयातभर तिच्या वरून मला टोमणॆ मारले, मला भेटू दिलं नाही. पण वास्तूवर मालकी हक्क दाखवायला ते माझ्यावरही हक्क दाखवतील. वारशाहक्काने मालमत्ता मिळवायला ते माझाही विचार करू शकतील तसा मरणाला मी भीत नाही... ओसाड काय फक्त वास्तूच होत नाही..
भयाण काय फक्त घरच होत नाहीत विराण काय फक्त घरासमोरच्या हौसेनं लावलेल्या बागाच होत नाहीत...
वास्तू असो की व्यक्ती ती आप आपलं प्राक्तन घेऊन येते
ती तिचं प्राक्तन भोगून गेली , मी माझं भोगतोय..
पण तरी मुलांच्या हातून मरण यावं असं मला वाटतं नाही... त्यापेक्षा खरच तिनेच यावं आणि तिच्या बरोबर जाण्याचा मार्ग दाखवावा....
तिचं भूत बीत होणं शक्यच नाही... ज्यांच्या इछ्चा अपूर्ण राहतात त्यांची भूतं होतात.. तिने एकच ईछ्चा धरली होती आणि नंतर डोळे कोरडे ठेऊन त्यावरही पाणी सोडलं होतं... वाचून संपलेलं पुस्तक छातीशी धरून बसावं तशी ती जगून झालेलं आयुष्य कवटाळून बसली होती...तीचा शेवट झाला, ती सूटली आणि मी त्या बंद दारापाशी अडकलो.. नक्की कुठल्या मार्गानं ती सटकली...?
जरा हालचाल झाली जरासा आवाज झाला वास्तू जरा बावचळली मला क्षणभर वाटलं तीच आली.. म्हणाली ये मी कुठून सटकले ती फट तुला दाखवते... खरं सांगतो अजिबात घाबरलो नाही उलट उत्सुकतेने सावरलो.. आली आहेस तर दिसत का नाहीस असं व्याकूळतेने म्हणालो....
आणि तिन्हिसांजेच्या त्या धुळकट अंधारात दिसली ती मनी... तिची लाडकी मनीमाऊ.. ही इतकी वर्ष कशी जगली? हिने मला कसं ऒळखलंन?
पण खरच ती मला घाबरली नाही मी ही घाबरलो नाही जणू तिने मला खूण केली आणि मी तिच्या मागे मागे वास्तूच्या परसदारी गेलो... वड पिंपळ तसेच होते विहिर जाळी टाकून बंद केली होती विहिरी जवळची केळ कधीच सूकून जळायला आतूर झाल्यासारखी जख्ख वाळली होती.. लाजाळूचं रान पसरलं होतं..
जास्त निरखायला वेळ नव्हता कारण माऊला वेळ नव्हता तिची घाई ओळखून मी माऊच्या मागे गेलो मागच्या जिन्याखाली एक अडगळीची खोली होती त्याचं दार धक्का देऊन उघडता येत होतं माऊ आत गेली तशी भारावल्या सारखा मी सुद्धा तिच्या मागनं आत गेलो...तिच्या इतकं सहज आत जाणं मला जमलं नाही...पण गेलो आणि बघतो तर काय या माऊने चार पिल्लाना जन्म दिला होता... ती माऊ तिची नव्हती पण तिच्या माऊच्या वंशातली होती... कारण दहा पंधरा मांजरं आपाअपली जागा घेऊन निवांत बसली होती... जणू मी तिथे येतो मी येणार हे त्याना माहीतच होतं.. जशी तिची मनी मी गेलो की माझ्या मांडीवर येऊन बसायची तशीच ती मांजरं माझ्या भोवती जमा झाली..त्यांच्या नजरा माझ्याशी संवाद साधायला तत्पर होत्या...लयबद्ध शेपटी हालवत होत्या पण त्यामुळे तिथली शांतता भंग पावत नव्हती...
क्षणात मला त्या वास्तूत चैतन्य जाणवलं...घडामोड हा सृष्टीचा नियम आहे ती या ना त्या रूपात सूरूच असते कधी तिचा प्रवाहं खळखळता असतो.. कधी लूप्त....तिथे
भयाण आधी कधी वाटलच नाही पण आता साचून राहिलेलं मौनही पसार झालं
मी घरभर फिरलो मागच्या खोलीत, रावजींच्या म्हणजे तिच्या वडिलांच्या खोलीत... खरमरीत नकार ऐकायला एकदा त्या खोलीत डोकावलो होतो....ती जिन्याशी नजर जमिनीला खिळवून उभी होती, बाहेर पडताना तिरमिरीत मी तिच्याकडे बघितलही नव्हतं... तो जिना आज मी चढून वर गेलो मागल्या गच्चीचं दार सताड उघडलं....अधाशा सारखा घर भर फिरलो आणि तिला म्हणालो भयाण तर माझं घर आहे जिथे मी राहतोय..तिथे माणसांचा वावर आहे पण सहवास नाही....
तुझा सहवास मिळणार असेल तर मी...मी इथे राहयला तयार आहे... तेंव्हाच दूर देवळात आरतीची घंटा वाजली त्या निरव शांततेत ती ताल धरून घुमली... आणि मी तोच कौल समजलो...

कौल..



घटना आणि प्रसंग यात काय फरक आहे?

घटना घडून जाते आणि प्रसंग लक्षात राहतो, त्यात एक अनुभव असतो जो आपल्याला विचार करायला भाग पाडतो गूंतवून ठेवतो

आमच्या डाँक्टरला म्हणजे विनायकला म्हणजे डाँ. विनायक पाटकरला काल परवा असाच एक अनुभव आला...

नाँर्मल या शब्दाचा अर्थ आपण सामान्य असा घेतो आणि सामान्य म्हणजे मला नेहमी चार चौघांसारखे असा वाटतो आणि तो काही प्रमाणात खराही आहे...

आपण सगळे गर्दीत मिसळून जायचा प्रयत्न करतो. चार चौघांसारखे वागायचा प्रयत्न करतो तरी डाँक्टर सारखी माणसं वेगळी उठून दिसतातच
परवा आमचा डाँक्टर नेहमीप्रमाणे दवाखान्यात जायला निघाला सकाळची वेळ तशी घाईची वेळ प्रत्येकाला कुठे ना कुठे वेळेत पोहोचायचं असतं अशावेळी हाय हँलो करायचाही मूड नसतो किंवा तयारी नसते
त्यात नातेवाईक दिसले तर भले भले कल्टी मारताना मी पाहिले आहेत पटकन रस्ताच बदलतील, पानपट्टीचा आडोसा घेतील, चालायचा वेग कमी करतील, तंद्रीत असल्यासारखं दाखवतील..पून्हा नातेवाईकाला टाळलं यात फुशारकी मानणारे महाभाग ही मी बघितले आहेत... मला काय म्हणायचय, घाई हा तुमचा नाईलाज होऊ शकतो पण ती तुम्ही तुमची हुषारी कशी समजता?
पण आमचा डाँक्टर खरच हुषार असला तरी साधा आहे
तर काय झालं, डाँक्टर दवाखान्यात जायला निघाला ,रस्त्याला लागला आणि काही अंतरावर त्याचा मामा त्याला दिसला... थकलेला वयस्कर,पार्कींसंस चा त्रास असलेला,एकटाच निघाला होता वसईला राहणारा मामा इतक्या सकाळी इथे काय करतोय? आणि चारकोपला आला तर घरी कसा आला नाही? म्हणून डाँक्टर कासावीस झाला... चक्क चार पावलं धावला त्याने मामाला आडवलं
पण पाहिलं तर तो दुसराच कोणी होता... सेम टू सेम मामा सारखे दिसणारे ते ग्रुहस्थ निमूट आपल्या वाटेने चालले होते
विनूने थांबवल्यावर ते थांबले त्याना बघून डाँक्टरच्या लक्षात आलं तो जरा खजील होत म्हणाला माफ करा हं! मला वाटलं माझा मामाच चालला आहे.. म्हणून मी धावत येऊन अडवलं
ते वयस्कर ग्रुहस्थ जरा हसले... म्हणाले वा वा बरं वाटलं मामाला रस्त्यात बघून धावत येऊन थांबवणारे भाचे अजून आहेत... नाहीतर आमचं नशीब
दोन दोन मुलगे आहेत पण एकाला बापा बरोबर दवखान्यात यायला वेळ नाही
पार्कंसंन सारखा आजार सांभाळत खुरडत खुरडत आम्हीच डाँक्टरांकडे जातो... जगायला तर हवच नाहीतर हिच्याकडे कोण बघणार?
संवादच खुंटला... आणखी एका शब्दाने संभाषण वाढवणं दोघानाही अशक्य झालं त्यातला फोलपणा दोघानाही जाणवला...पण डाँक्टर त्याना जाताना बघून अस्वास्थ झाला..हा प्रसंग खूप काही सांगून जातो नाही का?
मामाला बघून त्याला भेटायला धवणारे भाचे आहेत अजून.. अगदी निराशजनक चित्र नाही
आणि त्यात आता ग्रुहं संकूल उभं करताना संकुलातच व्रुद्धाश्रम उभं करण्याची कल्पक योजना सुचली आहे... झाकली मूठ सव्वा लाखाची राहयला मदत होईल
आमच्या डाँक्टरच्या अस्वस्थतेला देवाने दिलेला कौल आहे.. कारण तसा आमचा डाँक्टर देवभोळा सुद्धा आहे...

गाभारा…



जगात देव आहे हे मी आता ठामपणे सांगू शकतो, आता या बद्दल दुमत नाही वाद घालायचं सुद्धा कारण नाही, कोणी म्हणले दर्शन झालं का?.. नाही पण साक्षातकार झाला... अत्ता मी मारुतीला गेलो होतो तसा रोजच जातो..पण आज शनिवार ना? मारुतीचा वार... नेहमी येणार्‍या भक्तांपेक्षा शनिच्या भितीने भक्तीभावाने जमा होणारे भक्त जास्त असतात... अठरापगडचे भक्त, दाही दिशातून आलेले..त्यांची भक्ती म्हणजे काय विचारता? देऊळ छोटेखानी त्यात रस्त्याला लागून, प्रवासी बसेसची सतत ये जा श्रीमंत भक्त अर्थात गाडीने येतात ड्रायव्हरने शक्यतो देवळाच्या समोर सोडावं हा त्यांचा आग्रह मालकाला सोडून गाडिवान यु टर्न घेऊन जाणार त्यासाठी थोडा अवधी लागतोच आमच्यासारखे सामान्य तिथेच आपले रांगेत उभे... जो पर्यंत रांगेत असतो तो पर्यंत ठीक पण जस जसं गाभार्‍यापाशी पोहोचतो आमची भक्ती मनात उचंबळून यायला लागते.एकच झूंबड उडते त्यात गाभार्‍या समोर तेल सांडलेलं तेल उगाच सांडत नाही त्यालाही दुर्ल्क्षीत अनेक कारणं आहेत एक म्हणजे रांग पुढे सरकत असतानाच आमच्या हातात नारळ रुईच्या पानांचा हार उदब्त्ती उडीद शेंदूर घातलेल्या तेलाची वाटी लिंबूमिरची कोळसा असं काय काय दिलं जातं त्यात लहान मुलं असतील तर दहामुलांपैकी चार मुलं तेलाची वाटी हातात धरायचा हट्ट करतात बाल हट्टच तो पण तो कधी कुठे कसा पुरवायचा याला नियम नाही,चार पैकी दोघे पालक त्यामुलांच्या हातात तेलाची छोटी वाटी देतात रांगेतले भक्त चुळभुळत असतातच त्यात प्रदक्षिणा घालणारे जोरावर आलेले असतात. त्यात ते ही एक प्रदक्षिणा घालून गप्प बसत नाहीत. अकरा एकवीस एकावन्न प्रदक्षिणा घालणारे महाभाग आहेत भेदभाव करायचा नाही पण निरिक्षणावरून सांगतो यु पी चे लोक भक्ती इतरांवर लादतात.. आता इतक्या प्रदक्षिणा पूर्ण करायच्या तर त्याना लिटरली धावावं लागतं मग कोणाला धक्का लागला कोणाच्या पायावर पाय पडला तर काय झालं? असा त्यांचा अविर्भाव असतो.. या धावपळीत हमखास तेल सांडतं.. साऊथ इंडीयन असतात त्याना प्रदक्षिणे पेक्षा नमस्कार करण्यात जास्त भाव जाणवतो मग कोणी तिथेच तीन वेळा साष्टांग नमस्कार घालतं कोणी लोटंगण घालतं आता मारवाडी लोक जे आहेत ते मुर्तीसमोरून बाजूला होताना म्हणे देवाला पाठ दाखवत नाहीत, किती विनोदी प्रकार? देवाला पाठ दाखवायची नाही म्हणून चार पावलं ते उलटे मागे येतात म्हणजे बघाहं ! आधी प्रदक्षिणा घालणारे धावत असतात त्यात तेल सांडून सांडून जमीन पच्यपचीत झालेली असते निसरडी झालेली असते. लोटांगण घालणारे पडलेलेच असतात त्यात हे उलटे चार पावलं मागे येणारे मागे येतच असतात कल्पना करा अपघात कसा होऊ शकतो पण बरेचदा होत नाही,का? कारण देव तिथे हजर असतो तेलाची वाटी मुर्तीवर रीती करताना त्यातला शेवटचा उडीदही मुर्तेच्या शिरावर पडावा म्हणून टणा टणा मुर्तीवर वाटी आपटतात तो पर्यंत ते मागे हाटत नाहीत.. मग नारळ वाढवायचा असतो नारळ नुसता अर्पण करून चालत नाही कारण मग अर्धी वाटी मिळत नाही आणि काही काहींच्या घरी म्हणे अर्धी वाटी घरी नेल्याशिवाय घरात घेत नाहीत कारण दुसर्‍या दिवशी रविवार असतो.काहीजण छोटीवाटी मोठी वाटी असं परिक्षण उभ्या उभ्या करतात पण ते करायला तिथेच उभे असतात आणि त्यात रविवारी नारळ लागतोच.
त्यात परत नुसता नारळ वाढवून चालत नाही, नारळातलं पाणी आधी चारही दिशाना उडवायचं उरलेलं मुर्तीवर शिंपडायचं त्यासाठी ते पाणी सांडून संपायच्या आत फोडलेला नारळ घेऊन धावत जाऊन गाभारा गाठायचा तिथे आँलरेडी मुर्तीसमोर कोणीतरी ओंणवा असतोचपण त्या आधी तेल सांडलेल्या जमिनीवर नारळाच्या पाण्याचाही अभिषेक होतो चिकचिक वाढते त्यात यु पीची किती माणसं वाढली आहेत त्या प्रमाणात भक्तही वाढलेत पण निव्वळ तिथे देव अवतिर्ण होऊन ट्रँफिक पोलीसचं काम करत असावा म्हणून आमच्यासारखे बचावतात त्यात आणखी एक रिवाज आहे दक्षिणेकडचे काही भावीक तिथल्यातिथे नारळावर कापूर ठेऊन देवाला ओवाळतात.. तर काही महाभाग नारळाची शेंडी मुर्तीसमोरच्या दिव्यावर धरतात शेंडी चांगली शिलगे पर्यंत तिथून हाटत नाहीत कधी कधी ती शेंडी पेट घेते मग धावत जाऊन तो नारळ वढवायचा... हे सगळे रिवाज झाले भक्ती कुठे आली? भाव कुठे आला? तरीही तो निर्विकार राहून सगळ्याना सांभाळतो याचा अर्थ तो आहे की नाही?
मला खरच सगळ्याचा उबग आलाय..खास करून कणकेचे अकरा एकवीस एकावन्न दिवे लावणारे सुद्धा महाभाग आहेत ते ही म्हणे चढत्या उतरत्या क्रमाने.. ते दिसतात छान पण अपघाताचा विचार केला तर ते घातकच आहेत... खरच हे रिवाज ह्या पद्धती कोणी आणि का पाडल्या असतील सिव्हिल सेंस आपण इथे वापरत नाही तर तिर्थस्थानाला भेट देताना आपलं काय होत असेल काहीजण देवाला त्रास दिला की तो ऐकतो म्हणत मारुतीला मीठ फासतात किती अमानुष आहे हे... त्यासाठी खडे मीठ लागतं ते जमिनीवर सांडलं तर ते पायाला टोचतं भय्येलोकांसाठी खास चमेलीचं तेल विकायला असतं त्या तेलाच्या रिकाम्या बाटल्या भावीक(?) तिथेच टाकून जातात इतक्या गडबडीत तेलाच्या वाटीत आपला चेहरा एकाग्रपणे शोधत किंवा बघत काहीजण उभे असतात त्याना सांभाळण्याची जबाबदारी देवालाच घ्यावी लागते
त्यात भिकार्‍यांचा उपद्र्व पावसाची जोरदार सर आली तर ते सुद्धा देवळाच्या आसर्‍याला येतात त्यात भटकी कुत्री आहेतच आणि हे सगळं निस्तरायला मला वाटतं तो गाभारा सोडून सगळ्यांची काळजी घ्यायला बाहेर अवतीर्ण होतो.

मातीच्या गोष्टी….

लहानपणी आई एक गोष्ट अगदी रंगवून रंगवून सांगायची,आणि आम्हीही ती माहीत असलेली गोष्ट पून्हा पून्हा तितक्याच उत्कंठेने ऐकायचो... आता मला माहीत असलेली गोष्ट मी तुम्हाला सांगणार नाही असं होईल का?
तर एका गावा बाहेर एक साळीचं शेत असतं.चंडोलपक्षानं त्या पिकामधे आसरा घेत पिल्लांसाठी घरटं बांधलेलं असतं
चंडोल पक्षाचं घरटं असलं तरी त्याचा पत्ताच नसतो त्याची मादीच आपली तीन पिल्लाना सांभाळत त्या घरट्याची रखवाली ...करत असते. पिल्लाना चारा आण, किडॆ आण, टोळ मिळाला तर तो आणून भरव, कुठे काडी निसटली तर ती ठीक कर कापूस आणून भर, पिल्ल आपली बघावं तेंव्हा चोच आवासून आपल्या आईची वाट बघत असायची
ती पक्षीणी पिल्लं जरा मोठी झाल्यावर त्याना सांगते, घाबरायचं नाही कोणाची चाहूल लागली तर गप्प बसायचं कोण काय बोलतय, कसे आवाज काढतय सगळ्यावर लक्ष ठेवायचं
काही महत्वाचं वाटलं तर माझ्या कानावर घालायचं. पिल्लं आपली त्यांच्या भाषेत हो हो म्हणत माना डोलावतात. कुठेही जा माना डोलवणं सेमच असतं नाही.. आपण सुद्धा... असो! तर एकदा काय होतं?
त्या शेताचा जमीनदार शेताची पाहणी करायला शेतात फेरफटका मारायला येतो. बरोबर त्याचा लोचट मुनीमजी असतोच. तयार झालेलं शेत बघून जमिनदार म्हणतो "हं! शेत कापायला झालय, आता कापायला हवं... पिल्ल घाबरतात.. हे आईच्या कानावर घलायला हवं शेत कापलं तर आपण कुठे जायचं? आई आल्या आल्या पिल्ल कलकलाट करतात पण ते ऐकून आई आपली शांतच. पिल्ल विचारतात, आई तुला भिती नाही वाटत? आई म्हणते अजून नाही पण तुम्ही मात्र सावध रहा शब्दंशब्द ऐका आणि मला सांगा काही दिवस जातात पून्हा जमिन्दार येतो सोबत मुनीनजी असतोच
जमिनदार म्हणतो अरे आता शेत कापायला घ्यायला हवं जरा त्या शिरप्याला विचारा म्हणावं जरा कापून दे... पिल्ल हे ऐकातात तत्परतेने आईच्या कानावर घलातात तरी आई आपली शांतच
परत थोडे दिवस जातात शेत तसच डुलत असतं पिल्लं वाढत असतात पण अजून पंखात बळ येणं बाकी असतं त्या दरम्यान जमिनदार असाच फेर्‍या मारून जातो पाहणी करून जातो देवदयेनं या घरट्याकडे त्याचं लक्ष जात नाही. याला सां गा त्याला सांगा करण्यात समय जात असतो.
आणि एक दिवस जमिनदार येतो त्याच्या बरोबर त्याचा मुलगाही असतो कोणा कोणाला शेत कापायला सांगितलं याची उजळणी होते नोकर चाकर गडी माणसं,गावातली माणसं... शेवटी मुलगा म्हणतो जाऊदे अप्पा! आता उद्या अपणच येऊया आणि शेत कापायला घेऊया कशाला कोण हवय?
आई आल्या आल्या पिल्लं तिला हे सांगतात आणि जेंव्हा ती हे ऐकते की आता कोणावरही अवलंबून नं राहता जमिनदार स्वत:च शेत कापायला घेणार आहे तेंव्हा मात्र ती आई अस्वस्थ होते पिल्लाना दाखवत नाही पण जरा घाबरते
.. पिल्लं विचारतात..आई काय झालं?विचारात पडलेली ती आई म्हणते.. इतके दिवस ते दुसर्‍या कोणाची वाट बघत होते तो पर्यंत काळजी नव्हतीपण आता ते स्वत:च शेत कापणार म्हणजे.आपली इथून हलायची वेळ झाली.
पहाटेलाच पिल्लाना म्हणते जरा उडायचा प्रयत्न करा त्यानिंबावर जाऊन बसा .. आणि आईच्या इशार्‍या बरोबर ती पिल्लं घरटं सोडतात... कसाबसा जवळचा निंब गाठतात
माँरल आँफ द स्टोरी काय? स्वत:च्या कामासाठी स्वत:लाच उभं राह्वं लागतं
माझं कपाट आवरायची वेळ आलीकी राहून राहून मला ही गोष्ट आठवते.. तात्पर्य काय तर उद्या बहुतेक आपली भेट होणे नाही...

केळवण…

घटना आणि प्रसंग यात काय फरक आहे?
घटना घडून जाते आणि प्रसंग लक्षात राहतो, त्यात एक अनुभव असतो जो आपल्याला विचार करायला भाग पाडतो गूंतवून ठेवतो
आमच्या डाँक्टरला म्हणजे विनायकला म्हणजे डाँ. विनायक पाटकरला काल परवा असाच एक अनुभव आला...
नाँर्मल या शब्दाचा अर्थ आपण सामान्य असा घेतो आणि सामान्य म्हणजे मला नेहमी चार चौघांसारखे असा वाटतो आणि तो काही प्रमाणात खराही आहे...
आपण सगळे गर्दीत मिसळून जायचा प्रयत्न करतो. चार चौघांसारखे वागायचा प्रयत्न करतो तरी डाँक्टर सारखी माणसं वेगळी उठून दिसतातच
परवा आमचा डाँक्टर नेहमीप्रमाणे दवाखान्यात जायला निघाला सकाळची वेळ तशी घाईची वेळ प्रत्येकाला कुठे ना कुठे वेळेत पोहोचायचं असतं अशावेळी हाय हँलो करायचाही मूड नसतो किंवा तयारी नसते
त्यात नातेवाईक दिसले तर भले भले कल्टी मारताना मी पाहिले आहेत पटकन रस्ताच बदलतील, पानपट्टीचा आडोसा घेतील, चालायचा वेग कमी करतील, तंद्रीत असल्यासारखं दाखवतील..पून्हा नातेवाईकाला टाळलं यात फुशारकी मानणारे महाभाग ही मी बघितले आहेत... मला काय म्हणायचय, घाई हा तुमचा नाईलाज होऊ शकतो पण ती तुम्ही तुमची हुषारी कशी समजता?
पण आमचा डाँक्टर खरच हुषार असला तरी साधा आहे
तर काय झालं, डाँक्टर दवाखान्यात जायला निघाला ,रस्त्याला लागला आणि काही अंतरावर त्याचा मामा त्याला दिसला... थकलेला वयस्कर,पार्कींसंस चा त्रास असलेला,एकटाच निघाला होता वसईला राहणारा मामा इतक्या सकाळी इथे काय करतोय? आणि चारकोपला आला तर घरी कसा आला नाही? म्हणून डाँक्टर कासावीस झाला... चक्क चार पावलं धावला त्याने मामाला आडवलं
पण पाहिलं तर तो दुसराच कोणी होता... सेम टू सेम मामा सारखे दिसणारे ते ग्रुहस्थ निमूट आपल्या वाटेने चालले होते
विनूने थांबवल्यावर ते थांबले त्याना बघून डाँक्टरच्या लक्षात आलं तो जरा खजील होत म्हणाला माफ करा हं! मला वाटलं माझा मामाच चालला आहे.. म्हणून मी धावत येऊन अडवलं
ते वयस्कर ग्रुहस्थ जरा हसले... म्हणाले वा वा बरं वाटलं मामाला रस्त्यात बघून धावत येऊन थांबवणारे भाचे अजून आहेत... नाहीतर आमचं नशीब
दोन दोन मुलगे आहेत पण एकाला बापा बरोबर दवखान्यात यायला वेळ नाही
पार्कंसंन सारखा आजार सांभाळत खुरडत खुरडत आम्हीच डाँक्टरांकडे जातो... जगायला तर हवच नाहीतर हिच्याकडे कोण बघणार?
संवादच खुंटला... आणखी एका शब्दाने संभाषण वाढवणं दोघानाही अशक्य झालं त्यातला फोलपणा दोघानाही जाणवला...पण डाँक्टर त्याना जाताना बघून अस्वास्थ झाला..हा प्रसंग खूप काही सांगून जातो नाही का?
मामाला बघून त्याला भेटायला धवणारे भाचे आहेत अजून.. अगदी निराशजनक चित्र नाही
आणि त्यात आता ग्रुहं संकूल उभं करताना संकुलातच व्रुद्धाश्रम उभं करण्याची कल्पक योजना सुचली आहे... झाकली मूठ सव्वा लाखाची राहयला मदत होईल
आमच्या डाँक्टरच्या अस्वस्थतेला देवाने दिलेला कौल आहे.. कारण तसा आमचा डाँक्टर देवभोळा सुद्धा आहे...